शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Assam Assembly Election: पटनापासून १४०० किमीवर वसलेलं ‘मिनी बिहार’; जेथे बिहारी लोक बनवतात सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 08:29 IST

आसाममधील एक जिल्हा तिनसुकिया. जे पटना पासून जवळपास १४०० किमी दूर आहे, या जिल्ह्याला मिनी बिहार म्हणून ओळखलं जातं

ठळक मुद्देतिनसुकिया मतदारसंघातून बिहारचे शिव शंभु ओझा आमदार होते, ओझा यांचा तेथील राजकारणावर दबदबा होतातिनसुकिया मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलाने हिरादेवी चौधरी यांना उमेदवारी दिली आहे.तिनसुकिया मतदारसंघात हिंदी भाषिकांची संख्या अधिक असल्याने हा मतदारसंघ त्यांच्या ताब्यात आहे.

पटना – बिहारमधून इतर राज्यात स्थलांतरण केलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे, कामानिमित्त बिहारमधून लोक बाहेरच्या राज्यात जातात आणि त्याठिकाणी आपली संख्या वाढवतात. त्यामुळे अनेक राज्यात बिहारी लोकांच्या लोकसंख्येवर तेथील स्थानिक राजकारण अवलंबून असतं. सध्या आसाम विधानसभा निवडणुकीत बिहारी लोकांचं वर्चस्व समोर येत आहे.

आसाममधील एक जिल्हा तिनसुकिया. जे पटना पासून जवळपास १४०० किमी दूर आहे, या जिल्ह्याला मिनी बिहार म्हणून ओळखलं जातं, याठिकाणी बिहारी लोकांची भूमिका निवडणुकीत महत्त्वाची ठरते, तिनसुकिया मतदारसंघातून बिहारचे शिव शंभु ओझा आमदार होते, ओझा यांचा तेथील राजकारणावर दबदबा होता, यंदाही २०२१ च्या निवडणुकीत तिनसुकिया मतदारसंघात बिहारी मतदान निर्णायक भूमिकेत आहे.

आसाममधील तिनसुकिया मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलाने हिरादेवी चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. हिरादेवी मूळच्या बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात राहणाऱ्या आहेत. १९८४ मध्ये लग्नानंतर हिरादेवी आसाममध्ये आल्या. तिनसुकिया जिल्ह्यातील त्या मोठ्या उद्योजिका आहेत. सध्या हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे.  याठिकाणी विद्यमान आमदार संजोय किशन हेदेखील मैदानात उतरले आहेत. मागील वेळी त्यांनी काँग्रेस उमेदवार आणि सलग ३ वेळा आमदार राहिलेले राजेंद्र प्रसाद सिंह यांचा पराभव केला होता. त्यानंतर राजेंद्र सिंह भाजपात सहभागी झाले होते, त्यामुळे यंदा हा मतदारसंघ काँग्रेसने राजदसाठी सोडला आहे.

१५०० कुटुंब अधिक हिंदी भाषिकांची संख्या

तिनसुकिया जिल्ह्यात जवळपास १५०० कुटुंब असे आहेत, जे प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेत, जिल्ह्यातील ११०० गावांपैकी ३०० गावात हिंदी भाषिक आहेत, अनेक जण आसाममध्ये तीन-चार पिढ्यापासून राहत आहेत. आसाममध्ये अनेकदा बिहारी लोकांमुळे स्थानिकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप करत तेथे हिंसक आंदोलन घडले आहेत. तिनसुकिया मतदारसंघात हिंदी भाषिकांची संख्या अधिक असल्याने हा मतदारसंघ त्यांच्या ताब्यात आहे. येथे पहिल्यांदा राधाकृष्ण खेमका निवडून आले होते, ते २ वेळा आमदार होते, १९८५, १९९१ मध्ये येथून काँग्रेसचे शिव शंभू ओझा विजयी झाले, ते आसामच्या सरकारमध्ये मंत्री होते, ते तत्कालीन मुख्यमंत्री हितेश्वर सैकिया यांचे निकटवर्तीय होते.   

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१congressकाँग्रेसBJPभाजपाRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलBiharबिहार