शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दिल्ली, मुंबईच्या संस्थाकडून विधानसभानिहाय सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:30 IST

निवडणूक : विद्यमान आमदारांसह इतर पर्यायांवर शोध

जळगाव : विधानसभेची निवडणूक अवघ्या दोन महिन्यावर येवून ठेपली आहे. राजकीय पक्षांनी यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात भाजपा व शिवसेनेने दिल्ली, मुंबई येथील बड्या संस्थाकडून सर्वेक्षण सुरु केले आहे. यात आमदारांसह इच्छुक उमेदवार व नव्या पर्यायी उमेदवारांबाबत नागरिकांचे मत जाणून घेतले जात आहे. येत्या पंधरा दिवसात सर्वेक्षण पूर्ण करून पक्षश्रेष्ठींकडे याबाबतचा अहवाल दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.आता राजकीय पक्षांनी देखील प्रत्येक निवडणुकीआधी नागरिकांचे मत जाणून घेवून निवडणुकीत योग्य उमेदवार कोण चांगला राहिल याबाबतचे सर्वेक्षण करून उमेदवार देण्यावर भर दिसून येत आहे. यासाठीच निवडणुकीच्या काही महिने अगोदरच मतदारसंघामध्ये सर्व्हे करून योग्य उमेदवाराच्या नावाबाबत माहिती जमा केली जात आहे. जिल्ह्यातील जळगाव शहर, ग्रामीण, चाळीसगाव, एरंडोल, चोपडा, अमळनेर या विधानसभांमध्ये भाजपाभाजपाकडून वर्षभरात तीन वेळा सर्वेक्षणजसा काळ बदलत आहे, त्यानुसार राजकीय पक्षांकडून प्रचाराच्या तंत्रासह निवडणुकीआधीच नागरिकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न आता केला जात आहे. यामध्ये भाजपाने इतर पक्षांच्या तुलनेत आघाडी घेतलेली दिसून येत आहे. भाजपाने गेल्या वर्षभरापासूनच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असून वर्षभरात भाजपाचे जिल्ह्यातील ११ विधानसभांमध्ये तीन वेळा सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आता निवडणुकीला दोन महिने शिल्लक असताना अंतिम सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. २०१८ मध्ये जून-जुलै व नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये तर यावर्षी एप्रिल-मे महिन्यात सर्वेक्षण करण्यात आले होते. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीचे सर्वेक्षण व विधानसभा निवडणुकीचे सर्वेक्षण हे वेगवेगळ्या पातळीवरच करण्यात आले आहे.अशी आहे प्रश्नावलीशिवसेनेच्या सर्वेक्षणात विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमध्ये प्रामुख्याने युती करावी की नाही ?, युती केली तर फायदा कोणाचा ?, पाच वर्षात सत्तेत राहून शिवसेनेने जनतेसाठी भाजपा विरोधात घेतलेली भूमिका योग्य की अयोग्य ?, स्थानिक आमदारांचे काम कसे ? याबाबतची प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातून सुुरु केलेल्या जनआशिर्वाद दौऱ्याचा आधी व त्यानंतर अशा दोन टप्प्यात हे सर्वेक्षण करण्यात आला.ळगाव, चाळीसगाव, अमळनेरवर लक्षभाजपाच्या सर्वेक्षणात प्रामुख्याने जळगाव शहर, चाळीसगाव, अमळनेर या तीन्ही विधानसभांच्या जागांवर अधिक भर दिला जात आहे. चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील हे आता खासदार झाले असल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेबाबत योग्य उमेदवाराची चाचपणी सुरु आहे. तर अमळनेरला देखील अनेकजण भाजपाकडून इच्छुक असल्याने नागरिकांचे मत तपासले जात आहे. जळगाव शहराची जागेसाठी शिवसेनाही आग्रही असून, विद्यमान आमदार भाजपाचा आहे. अशा परिस्थितीत या जागेबाबतचा आढावा घेवून अंतिम अहवाल १० आॅगस्टपर्यंत पक्षश्रेष्ठींना देण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूक