शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

बेगुसरायची लढाई सामान्य विरुद्ध दिग्गजांमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 04:30 IST

बिहारमध्ये विरोधकांचे महागठबंधन विरुद्ध सत्ताधारी एनडीए अशा अनेक थेट लढती असल्या तरी बेगुसरायची लढत मात्र तिरंगी आहे.

असिफ कुरणेपाटणा : बिहारमध्ये विरोधकांचे महागठबंधन विरुद्ध सत्ताधारी एनडीए अशा अनेक थेट लढती असल्या तरी बेगुसरायची लढत मात्र तिरंगी आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू ) विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार हा भाकप (सीपीआय) तर्फे मैदानात उतरला आहे. त्याच्या उमेदवारीमुळे बेगुसराय येथील सामना हा सामान्य विरुद्ध दिग्गज यांच्यात होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला असून, इथे २९ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.बिहतमधील अंगणवाडी सेविकेचा सामान्य मुलगा ते दिल्लीतील जेएनयूच्या छात्रसंघाचा अध्यक्ष, तेथून तिहार जेल ते बेगुसराय असा प्रवास करत कन्हैयाकुमार मैदानात उतरला आहे. त्याने केंद्रीय मंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते गिरीराज सिंह व राजदचे तनवीर हसन यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. गिरीराज सिंह विजयी झाल्यास, त्यांचे राज्यातील स्थान बकळट होईल. पण कन्हैयाकुमार जिंकल्यास तो जायंट किलर ठरेल. बिहारमध्ये कमी झालेला भाकपाचा जनाधार वाढवण्यासाठी हा विजय मदतीचा ठरू शकतो.गेल्या निवडणुकीत मोदी लाटेत डॉ. भोला सिंग यांनी आरजेडीच्या तनवीर हसन यांचा ५८ हजार मतांनी पराभव केला. भाकपच्या राजेंद्र प्रसाद सिंग यांना तिसऱ्या क्रमांकाची १ लाख ८२ हजार मते मिळाली. यंदा गिरीराज सिंह यांनी सुरुवातीला येथून लढण्यास नकार दिला होता. पण पक्षाच्या दबावामुळे त्यांना मैदानात उतरावे लागले. तनवीर सिंग गेली पाच वर्षे निवडणुकीची तयारी करत आहेत. बिहारचे लेनिनग्राड अशी ओळख असलेल्या बेगुसरायमध्ये डाव्यांची लक्षणीय मते आहेत. कन्हैयाकुमारला 'आझादी' प्रकरणानंतर मिळालेली प्रसिद्धी कौतुकाचा विषय बनली आहे. त्याच्यामुळेच या मतदारसंघाला एवढे वलय लाभल्याची मतदारांची भावना आहे. कन्हैयाकुमारसाठी जेएनयूचे विद्यार्थी, शहीला रशीद, जिग्नेश मेवानी , अभिनेत्री स्वरा भास्कर तसेच काही फिल्ममेकर प्रचारात उतरले आहेत. गरीब कुटुंबातील कन्हैयाच्या निवडणूक खर्चासाठी क्राउड फंडिंगद्वारे तब्बल ७० लाख रुपये जमा झाले आहेत.>आरजेडीने टाळले : महागठबंधनकडून कन्हैयाकुमार यांच्या उमेदवारीसाठी सुरुवातीला प्रयत्न झाले. लालूप्रसाद यादव यांनीही हिरवा कंदील दाखवला. पण तेजस्वी यादवना कन्हैयाकुमार अडचणीचे वाटतात. त्यामुळेच त्यांनी तडजोड न करता आरजेडीचा उमेदवार दिला. भूमिहार समाजात प्रसिद्ध होत असलेले कन्हैयाकुमार भविष्यात वरचढ ठरतील या भीतीनेच तेजस्वी यादवनी त्यांना उमेदवारी देण्याचे टाळले, असे बोलले जाते.>जातीय गणिते महत्त्वाचीबेगुसरायमध्ये भूमिहार समाजाचे प्राबल्य आहे. गिरीराज सिंह ४ कन्हैयाकुमार भूमिहार आहेत. तिथे मुस्लीम व यादव यांची संख्याही मोठी आहे. हे समाज तनवीर हसन यांचे समर्थक मानले जातात. कोण कोणाची किती मते खातो, यावरच विजयाचे गणित ठरणार आहे.कन्हैयाकुमारच्या उमेदवारीमुळे तिन्ही उमेदवारांचा कस लागला आहे. गेल्या, २०१४ मध्ये भरभरून मते देणाºया या मतदारासंघाने २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकही आमदार दिला नाही. भाजपच्या मतात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे लढत तनवीर हसन विरुद्ध कन्हैयाकुमार अशीच होण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbegusarai-pcबेगूसराय