शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बंगालच्या ममतादीदींची एकहाती संघर्ष यात्रा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 05:02 IST

आज विधानसभेत प्रचंड बहुमताने ममता यांचा पक्ष सत्तेवर आहे. लोकसभेत बंगालमधील ४२ पैकी ३६ जागा त्यांनी जिंकून संसदेतील चौथा मोठा पक्ष हे स्थान पटकाविले आहे.

- वसंत भोसलेआज विधानसभेत प्रचंड बहुमताने ममता यांचा पक्ष सत्तेवर आहे. लोकसभेत बंगालमधील ४२ पैकी ३६ जागा त्यांनी जिंकून संसदेतील चौथा मोठा पक्ष हे स्थान पटकाविले आहे. तृणमूल कॉँग्रेस प्रादेक्षिक पक्ष होता. पण आसाम, मणिपूर, त्रिपुरा, केरळ, आदी राज्यांतील मतांच्या जोरावर हा पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यताप्राप्तही झाला आहे.‘मा, माटी, मानुश’ या घोषवाक्यासह बंगाली माणसांची अस्मिता २०११ जागृत करून, अखिल भारतीय तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी भारतीय राजकारणात इतिहास रचला. लोकशाही मार्गाने सलग ३४ चौतीस वर्षे सत्तेवर राहण्याचा जागतिक विक्रम करणाऱ्या कम्युनिस्टांचा पराभव त्यांनी केला. त्यांचा हा संघर्ष साधा नव्हता. बंगालमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीला पराभूत करण्याचे कॉँग्रेससह सर्व पक्षांचे प्रयत्न संपले होते. सलग सहा निवडणुका जिंकणाºया डाव्या आघाडीचा पश्चिम बंगालमध्ये पराभव होण्यावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता. २९ वर्षांच्या तरुण ममता बॅनर्जी यांनी १९८४ मध्ये कॉँग्रेसतर्फे लोकसभेची पहिल्यांदा जादवपूर मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बॅ. सोमनाथ चॅटर्जी यांचा पराभव केला होता. मात्र १९८९ मध्ये त्या पराभूत झाल्या. त्यामुळे १९९१ मध्ये त्यांनी दक्षिण कोलकत्तामधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आणि विजयही मिळवला. तेव्हापासून सलग सहावेळा त्या विजयी झाल्या. मात्र, राज्यात व विधानसभा निवडणुकीत माकपशी कॉँग्रेस संघर्ष करीत नव्हता. पर्याय देण्याचा प्रयत्न करीत नव्हता. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा १९९८ मध्ये स्वपक्षाशीच संघर्ष सुरू झाला. अखेरीस त्यांनी कॉँग्रेसचा त्याग केला आणि १ जानेवारी १९९८ रोजी तृणमूल कॉँग्रेसची स्थापना केली. देशात १९९८ ते २००९ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या सात निवडणुका झाल्या. डाव्या आघाडी लढताना तृणमूल कॉँग्रेसच्या पदरी पराभवच पडत होता. २००७ मध्ये डाव्या सरकारने सिंगूर आणि नंदीग्राममध्ये सेझ निर्माण करून औद्योगिक वसाहती स्थापण्याचा निर्णय घेतला. त्याचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसणार होता. त्यांच्या पाठीशी ममतांनी उभे राहून संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. हे दोन्ही प्रकल्प रद्द करावे लागले. त्या आंदोलनात अनेक शेतकरी मारले गेले.मध्यंतरीच्या काळात ममता बॅनर्जी यांनी भाजपशी आघाडी केली. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये त्यांचा समावेशही झाला. त्या आघाडीतही संघर्ष झाला. त्यांनी २०११ ची विधानसभा निवडणूक कॉँग्रेसशी आघाडी करून लढविली आणि २९४ पैकी १८४ जागा जिंकून डाव्या आघाडीचा पराभव केला. २० मे २०११ रोजी त्यांचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.

उत्तम कवयित्री आणि चित्रकार असलेल्या ममता बॅनर्जी यांचे राहणीमान अत्यंत साधे आहे. साधी सुती साडी आणि पायात स्लिपर्स घालूनच त्या वावरतात. त्यांनी आजवर काढलेल्या ३०० चित्रांपैकी काहींची विक्री झाली आणि त्यातून दहा कोटी रुपये त्यांना मिळाले आहेत. त्यांनी २०११ मध्ये ‘मा, माटी मानुष’ ही घोषणा देऊन बंगाली अस्मिता जागृत केली होती. त्यांनी ‘जागो बांगला’ वृत्तपत्रही चालविले आहे. बंगाली अस्मितेच्या आधारे एक नवी राजकीय संस्कृती त्यांनी निर्माण केली. कॉँग्रेस ते तृणमूल कॉँग्रेस, भाजप आघाडी ते कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी असा प्रवास करीत त्यांनी सर्वांशी संघर्ष केला. त्यांनी २०१२ मध्ये यूपीएशी काडीमोड घेतला. आज विधानसभेत प्रचंड बहुमताने त्यांचा पक्ष सत्तेवर आहे.
लोकसभेत बंगालमधील ४२ पैकी ३६ जागा त्यांनी जिंकून संसदेतील चौथा मोठा पक्ष हे स्थान पटकाविले आहे. तृणमूल कॉँग्रेस प्रादेक्षिक पक्ष होता. पण आसाम, मणिपूर, त्रिपुरा, केरळ, आदी राज्यांतील मतांच्या जोरावर हा पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यताप्राप्तही झाला आहे. तरीही पक्षाचे खरे बळ पश्चिम बंगालमध्ये आहे. आज विधानसभा आणि लोकसभेबरोबर स्थानिक संस्थांमध्ये तृणमूल कॉँग्रेसचे वर्चस्व आहे. ममता बॅनजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कडाडून विरोध करतात. भाजपने बंगालमध्ये हातपाय पसरण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. या निवडणुकीत एकेकाळी डाव्या आघाडीचा बालेकिल्ला तृणमूलच्या हाती गेलेला त्यांच्याच हाती सुरक्षित राहणार का? याचा निकाल या निवडणुकीत लागणार आहे. त्यासाठीही आता ममतादीदींचा संघर्ष नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी चालू आहे. संघर्षमय जीवनाने भरलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या हे बंगाली अस्मितेचे राजकारण आहे.उद्याच्या अंकात : उत्तरेतील बहुजन समाजाचा पक्ष

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपा