शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

Bihar Assembly Election 2020 :बेरोजगारीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी मूग गिळून गप्प - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 05:05 IST

Bihar Assembly Election 2020 News : बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांनी प्रचारमोहिमेच्या दुसऱ्या फेरीत पश्चिम चंपारण जिल्ह्यातील वाल्मीकीनगर येथे बुधवारी जाहीर सभा घेतली.

वाल्मीकीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर देशांतील समस्यांबद्दल बोलताना दिसतात; पण भारतामधील बेरोजगारी व अन्य समस्यांबद्दल ते आपल्या भाषणांतून अवाक्षरही काढत नाहीत, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांनी प्रचारमोहिमेच्या दुसऱ्या फेरीत पश्चिम चंपारण जिल्ह्यातील वाल्मीकीनगर येथे बुधवारी जाहीर सभा घेतली. ते म्हणाले की, दसऱ्याच्या दिवशी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. ते पाहून मनाला वेदना झाल्या. मोदींविषयी युवक व शेतकऱ्यांच्या मनात किती संताप आहे याचेच दर्शन प्रतिमा दहनाच्या निमित्ताने घडले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासमवेत घेतलेल्या प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदी आपल्या भाषणांमध्ये इतर देशांतील समस्यांचा उल्लेख करतात; पण भारतातील समस्यांबद्दल ते काहीच बोलत नाहीत. ही गोष्ट बिहार, पंजाब, उत्तर प्रदेशमधील युवक, शेतकऱ्यांना खटकते आहे. राहुल गांधी म्हणाले की, आपण दोन कोटी नोकऱ्या देणार, असे आता मोदी भाषणांतून सांगत नाहीत. समजा तसे त्यांनी आता सांगितले तर सभेला आलेले श्रोतेच त्यांना रोखतील. तुम्ही नोकऱ्या देण्याबाबत खोटे बोलला आहात, असे लोकच मोदींना सांगतील. देशाचा कारभार कसा करायचा याची काँग्रेसला उत्तम जाण आहे. शेतकरी, युवकांना कशी साथ द्यायची हे आमच्या पक्षाला माहीत आहे. मात्र, खोटे बोलण्याची सवय काँग्रेसला नाही. (वृत्तसंस्था)  

हा तर पायलट प्रोजेक्टराहुल गांधी म्हणाले की, २००६ साली बिहारमध्ये बाजार समित्या रद्द करण्यात आल्या. एक प्रकारे हा निर्णय तीन नवे कृषी कायदे संमत करण्याआधीचा पायलट प्रोजेक्ट असावा. जे नितीशकुमारांनी बिहारमध्ये २००६ साली केले तेच नरेंद्र मोदी आता पंजाबमध्ये करू पाहत आहेत.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी