शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Bihar Assembly Election Results: बिहारमधील भाजपचं यश म्हणजे फडणवीसांचा विजय? शरद पवारांचा मिश्किल टोला; म्हणाले...

By कुणाल गवाणकर | Updated: November 10, 2020 18:36 IST

Bihar Assembly Election Results: बिहारच्या निवडणूक निकालावर बोलताना शरद पवारांचा चिमटा

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दलाला बहुमत मिळताना दिसत आहे. मात्र राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचं महागठबंधन सत्ताधारी एनडीएला कडवी टक्कर देत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला मागे पडलेल्या भाजपनं नंतर जोरदार मुसंडी मारली. गेल्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला भाजप यंदा थेट पहिल्या क्रमांकासाठी राजदशी स्पर्धा करताना दिसत आहे. याचं श्रेय भाजप नेते प्रसाद लाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक टोला लगावला आहे.'देवेंद्र फडणवीसांनी नक्कीच इथं बसून बिहारची सुत्रं हलवली असतील'बिहारमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारली आहे. गेल्या निवडणुकीत ५३ जागा जिंकणारा भाजप सध्या ७२ जागांवर पुढे आहे. विशेष म्हणजे भाजपनं घेतलेल्या भरारीमुळे जेडीयू मागे गेला आहे. त्यामुळे भाजप आघाडीमधील मोठा भाऊ ठरला आहे. बिहारमधील निवडणुकीचे प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे भाजपचं यश म्हणजे फडणवीसांचा विजय असल्याचं भाजप नेते प्रसाद लाड म्हणाले.बिहारमध्ये अपेक्षित निकाल लागला नाही, शरद पवारांनी सांगितलं कारणराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना बिहारमधील भाजपच्या कामगिरीतील फडणवीस यांच्या योगदानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर 'हा चमत्कार आमच्या डोक्यात प्रकाश पाडणारा होता; फार चांगली माहिती सांगितली तुम्ही,' अशी खोचक प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. यावेळी त्यांनी राजद नेते तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं. तेजस्वी यांनी अतिशय चांगली लढत दिली. त्यांनी भाजप, जदयू विरोधात चांगली कामगिरी केली, अशी स्तुतीसुमनं पवार यांनी उधळली. बिहारमध्येही ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ होऊ शकतं; शिवसेना मंत्र्याचा मोठा दावाकाय म्हणाले होते प्रसाद लाड?बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीएचा धुव्वा उडाल्याचं चित्र एक्झिट पोलमध्ये दाखवलं, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात वातावरण असल्याचं दाखवलं. मात्र, बिहारमधील जनतेने भाजपवर, पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवला” अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी एका मराठी वृत्त वहिनीला दिलेली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीची जबाबदारी उचलली. राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचंही हे यश आणि विजय आहे. या निवडणुकीत एनडीए १३० च्या वर जाईल आणि महागठबंधन १०० च्या खाली येईल, असा विश्वासही यावेळी प्रसाद लाड यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा