शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

“पूर येणे हा दैवी प्रकोप, पीडितांना भेटायला जाणार नाही”; केंद्रीय मंत्र्यांचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 16:03 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही बिहारमध्ये पूरस्थिती बिकट आणि भयावह बनली आहे.

पाटणा: दरवर्षीप्रमाणे यंदाही बिहारमध्ये पूरस्थिती बिकट आणि भयावह बनली आहे. अनेकांना याचा फटका बसलाय. मात्र, अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये सहभागी झालेले केंद्रीय खाद्य आणि प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस यांनी अजब तर्कट केले असून, पूर येणे हा देवाचा कोप आहे, असे सांगत पूरग्रस्त भागातील पीडितांना भेटायला जाण्यास त्यांनी चक्क नकार दिला. (bihar pashupati paras says he will not meet people suffering from floods)

अटकेनंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले...

केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर पशुपती कुमार पारस प्रथमच बिहारमध्ये गेले होते. आपला संसदीय मतदारसंघ हाजीपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना पारस म्हणाले की, पूर येणे हा देवाचा प्रकोप आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये पूर येतात. एवढेच नव्हे, तर प्रत्येक वर्षी बिहारमध्ये पूर येतो. पूरग्रस्तांना भेटायला गेले पाहिजे, असे मला वाटत नाही, असे पारस यांनी म्हटले आहे. 

नेपाळशी चर्चा करणे महत्त्वाचे

बिहारमध्ये येणाऱ्या पूराचे मुख्य कारण नेपाळ आहे. बिहारमधील पूरस्थिती नियंत्रणात आणायची असेल, तर नेपाळशी चर्चा करायला हवी. तसेच प्रत्येक वर्षी पूराचा सामना बिहारला करावा लागत असल्याने पीडितांना हरसंभव मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे पारस यांनी स्पष्ट केले. 

“१४ महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा काय?”; भाजपची विचारणा

दरम्यान, पुतण्या चिराग पासवान याच्याशी मोठे राजकीय मतभेद झाल्यानंतर बिहामधील राजकीय वातावरण तापले होते. यानंतर लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पारस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. चिराग पासवान हे राम विलास पासवान यांच्या संपत्तीचे वारस असू शकतात. मात्र, त्याचा उत्तराधिकारी मीच आहे, असे पारस यांनी म्हटले होते. या घडामोडींनंतर पारस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देत भाजपने घटक पक्षाला खुष ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. 

टॅग्स :BiharबिहारCentral Governmentकेंद्र सरकार