शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

Bihar Result: बिहारमध्ये महाआघाडीची सत्ता स्थापनेची तयारी; मात्र तेजस्वींना काँग्रेस आमदार फुटण्याची भीती

By प्रविण मरगळे | Updated: November 12, 2020 16:19 IST

Bihar Result, Tejashwi Yadav, Congress, RJD News: मंत्रिमंडळात जीतनराम मांझी, मुकेश सहनी यांच्या पक्षाला किती टक्के वाटा मिळणार? याकडे महाआघाडीचे लक्ष आहे.

ठळक मुद्देनितीश कुमार यांनी विश्वासघातकी सरकार बनवलं आहे. अनेक ठिकाणी मतमोजणीत गडबड झाल्याचा आरोपबिहारमध्ये महाआघाडीला ११० जागा मिळाल्या आहेत, त्यात राजदने ७५ जागा जिंकल्या आहेतकाँग्रेसमुळे महाआघाडीचा विजय झाला नाही हे सत्य पक्षाने स्वीकारलं पाहिजं - काँग्रेस नेते तारिक अन्वर

पटणा – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात भलेही एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गुरुवारी पटणा येथे माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्या निवासस्थानी महाआघाडीच्या नेत्यांची बैठक झाली, या बैठकीत राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी आमदारांना संबोधित करताना बिहारमध्ये महाआघाडीचं सरकार बनेल असा दावा केल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

याबाबत तेजस्वी यादवांनी आमदारांना सूचना केल्या की, पुढील महिनाभर तुम्ही सगळ्यांनी पटणामध्येच राहा. महाआघाडीतील काँग्रेसचे काही आमदार फुटण्याची भीती तेजस्वी यादव यांना आहे. त्यामुळे तेजस्वी यादव पूर्णपणे सतर्क राहत आहेत. या बैठकीत महाआघाडीचा नेता म्हणून तेजस्वी यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिहारमध्ये राजद पाठोपाठ भाजपाला सर्वाधिक ७४ जागा मिळाल्या आहेत आणि जदयूला ४३ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. यातच भाजपातील काही नेते मुख्यमंत्रिपदाची मागणी करत आहेत, त्यामुळे एनडीएत काही आलबेल नसल्याने महाआघाडीला अद्यापही आशा कायम आहे.

मंत्रिमंडळात जीतनराम मांझी, मुकेश सहनी यांच्या पक्षाला किती टक्के वाटा मिळणार? याकडे महाआघाडीचे लक्ष आहे. त्यामुळे एनडीए जर काही बिनसलं तर महाआघाडी त्याचा फायदा घेत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणार आहे. या बैठकीत तेजस्वी यादव म्हणाले की, जनतेने महाआघाडीला समर्थन दिलं आहे. आपल्याला जवळपास १३० जागा मिळाल्या असत्या. पण नितीश कुमार यांनी विश्वासघातकी सरकार बनवलं आहे. अनेक ठिकाणी मतमोजणीत गडबड झाल्याचा आरोप तेजस्वीने केला आहे.

बिहारमध्ये महाआघाडीला ११० जागा मिळाल्या आहेत, त्यात राजदने ७५ जागा जिंकल्या आहेत. राजदकडून सरकारवर उमेदवारांना हरवण्याचा आरोप करण्यात येत आहे. डाव्यांना १६ जागा मिळाल्या असून महाआघाडीतील काँग्रेसच्या कामगिरीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. खुद्द काँग्रेस नेते तारिक अन्वर यांनी काँग्रेसमुळे महाआघाडीचा विजय झाला नाही हे सत्य पक्षाने स्वीकारलं पाहिजं असं म्हटलंय. तर काँग्रेसचा स्ट्राइक रेट खूप कमी राहिला, जर या जागा डावे आणि राजदा मिळाल्या असत्या तर निकाल वेगळा लागला असता अशीही चर्चा बैठकीत झाली. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने ७० जागा लढवून अवघ्या १९ जागांवर विजय मिळवला आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपाTejashwi Yadavतेजस्वी यादवcongressकाँग्रेस