शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सर्वजण झोपेत असतानाच हे सरकार जाईल; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 16:55 IST

मराठा आंदोलनालाही भाजपचा पाठींबा असेल, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य

ठळक मुद्देमराठा आंदोलनालाही भाजपचा पाठींबा असेल, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य

सध्या सरकारमध्ये काही वाद सुरू आहेत, अशा चर्चांना उधाण आलं होतं. तसंच या सर्व अफवा असून सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असंही सत्ताधाऱ्यांकडून सांगत चर्चा या केवळ अफवा असल्याचं म्हटलं जात आहे. यादरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्वजण झोपेत असतानाच हे सरकार जाईल असं मोठं विधान केलं आहे."देवेंद्र फडणवीस मध्यंतरी असं म्हणाले, झोपेतून उठलो होतो आणि सरकार गेलं होतं. केसानं गळा कापण्यासारखा विश्वासघात झाला होता असं ते म्हणाले. मी त्यावर असं म्हटलं तुम्ही सर्व विचारताय हे सरकार कधी जाईल. ते असंच सर्वजण झोपेत असताना सरकार जाईल. त्यांना कळणारच नाही सरकार कधी गेलं," असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यांना आरक्षणच द्यायचं नव्हतं"यांना मराठा समाजाला कधी आरक्षणच द्यायचं नव्हतं. १९९५-९९ आणि २०१४ -१९ ही वर्ष सोडली तर यांचंच राज्य होतं. त्यांनी त्यावेळी का नाही दिलं मराठा आरक्षण?," असा सवालही त्यांनी केला. "आता रिव्हू पीटीशन दाखल करतील नाहीतर लोकं यांना मारतील. परंतु ते रिव्ह्यू पीटीशन योग्यरित्या चालवणार नाहीत. केंद्र रिव्ह्यू पीटीशन योग्यरित्या चालेवेल. मराठा समाजाला वर्षानुवर्ष आंदोलन करूनही जे आरक्षण मिळालं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी दिलं आणि टिकवलंही. परंतु या सरकरला ते टिकवता आलं नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जे कोणी आंदोलन करतील त्याला आमचा पाठींबा आहे," असंही पाटील म्हणाले. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी