शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

हिंदूंवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा 'किमान समान कार्यक्रम' झालाय; नितेश राणेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 11:02 AM

Coronavirus : राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी असलेल्या ठिकाणी निर्बंध काही प्रमाणात करण्यात आलेत शिथिल. १७ ऑगस्टपासून राज्यात भरणार पहिली ते सातवीचे वर्ग.

ठळक मुद्दे राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी असलेल्या ठिकाणी निर्बंध काही प्रमाणात करण्यात आलेत शिथिल. १७ ऑगस्टपासून राज्यात भरणार पहिली ते सातवीचे वर्ग.

कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या आणि निर्बंध शिथील झालेल्या जिल्ह्यांमध्ये १७ ऑगस्टपासून पहिली ते ७ वीच्या शाळांचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ८ वी ते १० वीच्या शाळा या आधीच म्हणजे १५ जुलैपासून सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण कमी असलेल्या ठिकाणी दुकानांची वेळही वाढवण्यात आली आहे. परंतु धार्मिक स्थळं मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. मंदिरं उघडण्यास परवानगी नसल्यानं भाजपचे नेते नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. 

"२ दिवसात लोकल चालू, १७ ऑगस्ट पासून शाळा चालू, मग २ डोस घेतलेल्यांना मंदिर दर्शन का नाही ? हे सरकार नाक दाबल्या शिवाय काहीच करत नाही का?, हिंदूंवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा 'किमान समान कार्यक्रम' झाला आहे," असं म्हणत नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल केला.  काही दिवसांपूर्वीच राज्यातील कमी होणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर काही जिल्हे सोडून निर्बंध शिथिल करण्यात आले. ज्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे, त्या ठिकाणी काही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. असं असलं तरी चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मॉल्स सुरू करण्यास परवानगी असली तरी मॉल्समधील मल्टीप्लेक्स बंद ठेवण्यात येणार आहेत. यासाठी कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. तसंच राज्यातील सर्व धार्मिक स्थळेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

जिम, व्यायामशाळा, योगा केंद्र, ब्युटी पार्लर्स, केश कर्तनालय यांनी वातानुकूलन वापरायचे नसून, सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील. शनिवारी दुपारी ३ पर्यंत आणि रविवारी पूर्ण बंद राहणार आहेत.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रSchoolशाळाVarsha Gaikwadवर्षा गायकवाडcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTheatreनाटकlocalलोकलrailwayरेल्वे