शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

महाराष्ट्रातील भाजपा नेते अडचणीत; झारखंड सरकार पाडण्याचं षडयंत्र उघड झाल्यानं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 07:48 IST

झारखंड षड् यंत्राची महाराष्ट्रात चाैकशी?; आराेपींना भेटले राज्यातील भाजप नेते

ठळक मुद्देझारखंडमध्ये आमदारांचा घाेडेबाजार करून सरकार पाडण्याचा कट रचण्यात आला हाेता. पाेलिसांनी एका हाॅटेलमधून अभिषेक दुबे, अमित सिंह आणि निवारण महताे यांना अटक केलीपोलिसांनी छापा टाकण्याच्या १५ मिनीटांपूर्वीच हे सर्व नेते निघून गेले हाेते. अन्यथा त्यांनाही अटक झाली असती.

एस. पी. सिन्हारांची : झारखंडमध्ये हेमंत साेरेन यांचे सरकार पाडण्याच्या षड्यंत्राचा पाेलिसांनी भांडाफाेड केल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आराेपींचे महाराष्ट्र कनेक्शन समाेर आले आहे. मात्र, पाेलिसांनी केलेल्या या कारवाईवरच आता संशय व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटींमागे हवाला कनेक्शनचा शक्यता असून ते लपविण्यासाठी सरकार पाडण्याचा कट असल्याचे प्रकरण पाेलीसांनी उभे केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.  याप्रकरणी महाराष्ट्रातील नेत्यांची चाैकशी हाेण्याची शक्यता आहे.

झारखंडमध्ये आमदारांचा घाेडेबाजार करून सरकार पाडण्याचा कट रचण्यात आला हाेता. याबाबत आमदार अनुप सिंह यांनी केलेल्या तक्रारीवरून पाेलिसांनी छापे मारले हाेते. पाेलिसांनी एका हाॅटेलमधून अभिषेक दुबे, अमित सिंह आणि निवारण महताे यांना अटक केली हाेती. हे तिघे २१ जुलैला जयकुमार बेलखोडे, माेहित कंबाेज, अनिल कुमार, जयकुमार शंकरराव आणि आशुताेष ठक्कर यांना हाॅटेल ली-लॅकमध्ये भेटल्याचा दावा पाेलिसांनी केला आहे. पोलिसांनी छापा टाकण्याच्या १५ मिनीटांपूर्वीच हे सर्व नेते निघून गेले हाेते. अन्यथा त्यांनाही अटक झाली असती. बेलखोडे हा भाजपचे माजी आमदार व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भाचा आहे, तर माेहित कंबाेज हे मुंबईतील माेठे व्यावसायिक व मुंबई प्रदेश भाजपचे माजी उपाध्यक्ष आहेत, तर दुबे हा फळ विक्रेता असून, सिंह हा ठेकेदार आहे.

झारखंडमध्ये भाजपचे २५ आमदार आहेत. बहुमतासाठी ४२ आमदारांचे समर्थन आवश्यक आहे. त्यामुळे झारखंडमध्ये सरकार पाडणे भाजपसाठी साेपे नाही. त्यातच संशयित आराेपी असलेले किरकाेळ व्यावसायिक आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या मदतीने सरकार पाडण्याचे कारस्थान रचण्याची काय गरज पडली? झारखंडमध्ये नेत्यांची कमतरता आहे का? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. रांची पाेलिसांनी याप्रकरणी एसआयटी स्थापन केली आहे. चार पथके हाॅटेलपासून विमानतळापर्यंत विविध ठिकाणी तपासामध्ये गुंतले आहेत. 

एसआयटी नेमून चौकशी करामाजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांनी साेरेन सरकारवर महाराष्ट्राप्रमाणेच पाेलिसांचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आराेप केला आहे. या एकूण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करून चाैकशी करण्याची मागणी मरांडी यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील नेत्याचे हवाला कनेक्शन?महाराष्ट्रातून रांचीला आलेल्या लाेकांचे हवाला कनेक्शनदेखील असण्याचा दाट संशय सूत्रांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र, झारखंड, बिहार आणि छत्तीसगढचा परिसर हवाला काॅरीडाेर म्हणून ओळखला जाताे. माेठ्या आर्थिक देवाण-घेवाणीसंदर्भात महाराष्ट्रातील पदाधिकारी आराेपींना भेटले असावे. मात्र, पाेलिसांनी हवालाऐवजी सरकार पाडण्याच्या कटाचे प्रकरण उभे केले. हवाला ॲंगलमध्ये राज्यातील बडे नेते अडकले असते आणि परिणामी सरकारची बदनामी झाली असती, असे सूत्रांचे म्हणणे आहे. यावरुन अनेक आमदारांनीही वक्तव्ये केली आहेत.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसPoliceपोलिस