शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

“ठाकरे सरकार कामच करत नसेल, तर मग आरत्या ओवाळायच्या का”; भाजपची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 22:33 IST

भाजपने शिर्डी प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारवर टीका करण्यात आले. ठाकरे सरकार कामच करत नसेल, तर मग आरत्या ओवाळायच्या का, असा खोचक टोला लगावला आहे.

ठळक मुद्देनीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा राजीनामा द्यावापोलिसांची मदत घेऊन सरकारचा राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्नभाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे सरकारवर केली टीका

शिर्डी: केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या अटकनाट्यानंतर याचे पडसाद राज्यभरात उमटल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन, निषेध, निदर्शने केली. याशिवाय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही मोठ्या प्रमाणात झडल्या. यातच भाजपने शिर्डी प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारवर टीका करण्यात आले. ठाकरे सरकार कामच करत नसेल, तर मग आरत्या ओवाळायच्या का, असा खोचक टोला लगावला आहे. (bjp radhakrishna vikhe patil criticized thackeray govt over narayan rane arrest) 

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात शिर्डीच्या प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधला. राज्यातील महाविकासआघाडी सरकार पोलिसांच्या मदतीने राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप विखे पाटील यांनी यावेळी केला. 

मोदी सरकारकडून आता कोकण रेल्वेचे खासगीकरण? ७२८१ कोटींचा निधी उभारणार

तर मग आरत्या ओवाळायच्या का?

पोलिसांची मदत घेऊन महाविकास आघाडी सरकारने राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना आहे. असे यापूर्वी कधीही घडले नाही. लोकशाहीत मत प्रदर्शित करण्याचा अधिकार आहे, अशी टीका करत इथे लोकांचे बळी जात आहेत, पण सरकार कामच ‌करत नाही. असे असेल तर मग तुमच्या आरत्या ओवाळायच्या का, असा खोचक सवाल विखे पाटील यांनी केला आहे. 

नीलम गोऱ्हेंनी राजीनामा द्यावा

जेव्हा जनतेची स्वाभाविक प्रतिक्रिया उमटत असेल तर तुम्ही गुन्हे दाखल करणार का? महाडच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे सरकार तोंडावर पडलेय, असा टोला लगावत नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा राजीनामा द्यावा. हे पद घटनात्मक पद आहे. ते कोणत्या पक्षाचे नसते. असे असतानाही त्या राजकीय भूमिका मांडतात, बोलतात. त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे. 

मोदी सरकारचा मोठा निर्णय! रोजगाराला चालना मिळणार; १५ हजार कोटींच्या गुंतवणुकीला मंजुरी

दरम्यान, नारायण राणे यांचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्या‌ जिव्हारी लागले. खरे तर मुख्यमंत्र्यांनी अगोदर माफी मागावी. देशाचा अमृत महोत्सव की हीरक महोत्सव हे त्यांना समजत नसेल, तर हा देशवासीयांचा व स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे. मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही विखे पाटील यांनी केली आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना