शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
3
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
4
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
5
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
6
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
7
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
8
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
9
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
10
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
11
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
12
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
13
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
14
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
15
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
16
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
18
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
19
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
20
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते

"ममतांनी जिल्हाधिकाऱ्यांना बोलूच दिलं नाही; म्हणाल्या, त्यांच्यापेक्षा जास्त मला माहिती", भाजपाचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 18:00 IST

PM Modi Meeting on Corona Situation: ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'ना लस, ना धोरण, आम्हाला बोलूच दिले नाही', असे म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला

ठळक मुद्देममता बॅनर्जींच्या या आरोपाला आता केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ममता बॅनर्जी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बोलूच दिले नाही, असा आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी गुरुवारी विविध राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी कोरोनासंदर्भात ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्या-त्या राज्यांचे मुख्यमंत्रीही या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal Mamata Banerjee) हजर होत्या. या बैठकीनंतर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'ना लस, ना धोरण, आम्हाला बोलूच दिले नाही', असे म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. ममता बॅनर्जींच्या या आरोपाला आता केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ममता बॅनर्जी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बोलूच दिले नाही, असा आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.  (bjp retaliated on mamta ravi shankar prasad says mamata conduct shameful)

"आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरोधात चांगल्या कामांची माहिती शेअर करण्यासाठी काही राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आचरण आज अत्यंत अशोभनीय होते. त्यांनी संपूर्ण बैठकीला एक प्रकारे पटरीवरुन उतरवण्याचे काम केले", असे रविशंकर प्रसाद म्हणाले. 

याचबरोबर, "ममता बॅनर्जींनी आरोप केला की फक्त भाजपाशासित राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांनाच बोलावले जाते. पण, पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत आंध्र प्रदेश, केरळ, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांनीही आपले मत मांडले. ममता बॅनर्जी यांनी 24-परगनाच्या जिल्हाधिकाऱ्यांना बोलू दिले नाही. त्या म्हणाल्या की जिल्हाधिकाऱ्यांना काय माहिती, त्यांच्यापेक्षा जास्त मला माहिती आहे", असे सांगत रविशंकर प्रसाद यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे.

'आम्हाला कोरोना लसीची मागणी करायची होती, मात्र बोलूच दिले नाही'मोदींसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनंतर ममता बॅनर्जी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. "भाजपाचे काही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांनी आपआपले मुद्दे मांडले. मात्र आम्हाला बोलण्याची संधी मिळाली नाही. सर्व मुख्यमंत्री केवळ गप्प बसून होते. कोणीही काहीही बोलले नाही. आम्हाला कोरोना लसीची मागणी करायची होती, मात्र बोलूच दिले नाही" असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीRavi Shankar Prasadरविशंकर प्रसादNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगाल