शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

"लेडी तालिबानला पाहायचं असेल तर कालीघाटमध्ये या"; भाजपाची ममता बॅनर्जींवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 1:04 PM

BJP sayantan basu says lady taliban lives in kalighat at kolkata : पश्चिम बंगालमधील भाजपाच्या महासचिवांनी पुन्हा एकदा ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "लेडी तालिबान" म्हणत निशाणा साधला आहे. 

नवी दिल्ली - अफगाणिस्तानात मोठा हिंसाचार सुरू आहे. तालिबाननेअफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केला. राजधानी काबुल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानींनी संसद, राष्ट्रपती भवनावर कब्जा केला. तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर संपूर्ण जगात खळबळ माजली आहे. याच दरम्यान पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचाराची तुलना भाजपाच्या काही नेत्यांनी आता तालिबान्यांशी केली आहे. पश्चिम बंगालमधील भाजपाच्या महासचिवांनी पुन्हा एकदा ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "लेडी तालिबान" म्हणत निशाणा साधला आहे. 

भाजपाचे बंगाल राज्याचे महासचिव सायंतन बसू (Sayantan Basu) यांनी "लेडी तालिबानला (Lady Taliban) पाहायचं असेल, तर कालीघाटमध्ये या" अशा शब्दांमध्ये ममता बॅनर्जींवर बोचरी टीका केली आहे. राज्यात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांबाबत बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे. "तूणमूल सत्तेत आल्यापासून विरोधी पक्षांच्या सर्व अधिकारांवर गदा आणली जात आहे. बंगालमध्येही तालिबानी शासनच सुरू आहे. जर कोणाला तालिबान पाहायचं असेल, तर तिकीट काढून काबुलला जाण्याची गरज नाही. येथे कालीघाटमध्येच तुम्ही लेडी तालिबानला पाहू शकता" असं म्हटलं आहे. 

सायंतन बसू यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं उघडपणे नाव घेतलं नसलं तरी कालीघाटमध्ये मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे. भाजपा नेत्याच्या या विधानावर तृणमूल काँग्रेसचे महासचिव पार्थ चॅटर्जी (Parth Chatterjee) यांनी उत्तर दिलं आहे. भाजपा नेत्यांनी अशी विधाने केल्यास तृणमूल ते सहन करणार नाही. याचं आम्ही वेळीच योग्य उत्तर देऊ असं चॅटर्जी यांनी म्हटलं आहे. तर काही नेत्यांनी या विधानाचा निषेध करून भाजपावर जोरदार टीका केली आहे. सायंतन बसू यांच्या या विधानाने पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"ज्या लोकांना भारतात भीती वाटते, त्यांनी अफगाणिस्तानात निघून जावं, तिथे पेट्रोल पण स्वस्त आहे" 

काही दिवसांपूर्वी भाजपाच्या एका आमदाराने एक वादग्रस्त विधान केलं होतं. ज्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला असून राजकारण तापलं होतं. "ज्या लोकांना भारतात राहायची भीती वाटते, त्यांनी अफगाणिस्तानात निघून जावं, तिथे पेट्रोल पण स्वस्त आहे" असं आमदाराने म्हटलं. हरिभूषण ठाकूर (BJP Haribhushan Thakur) असं या भाजपा आमदाराचं नाव असून त्यांच्या या विधानाने नवा वाद निर्माण झाला. ठाकूर यांनी "अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र ज्या लोकांना येथे देशात राहायची भीती वाटते, त्यांनी अफगाणिस्तानात जावं, तिथे पेट्रोल देखील स्वस्त आहे" असं म्हटलं आहे. त्यांच्या या विधानावरून अनेकांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपाTalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानPoliticsराजकारण