शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

West Bengal: भाजपा टेन्शनमध्ये; 8 जिंकलेले-हरलेले आमदार, खासदार ममतांकडे परत जाण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 12:41 IST

West Bengal Politics: निवडणुकीत भाजपाच्या पराभवानंतर पक्षात मोठा गोंधळ उडालेला आहे. तृणमूल काँग्रेसमधून आलेले अनेक नेते आता परत जाण्याचे मार्ग शोधू लागले आहेत. भाजपा नेते तथागत रॉय यांनी निवडणूक निकालानंतर याचे भाकित केले होते.

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) भाजपाने (BJP) जोरदार वातावरणनिर्मिती केल्याने तृणमूलच्या अनेक बड्या नेत्यांनी तिकडे उड्या मारल्या होत्या. मात्र, आता निवडणुकीत तृणमूलने बाजी मारल्याने या नेत्यांनी पुन्हा ममतांच्या पक्षात जाण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाचे वरिष्ठ नेते तथागत रॉय यांनी याची शक्यता व्यक्त केली होती. आता त्यांनी मी जे बोललेलो ते खरे ठरत आहे. दिल्लीत जाऊन वरिष्ठांना या आयाराम नेत्यांनी काय केले ते सांगणार आहे, असे म्हटले आहे. (BJP leaders wants to return in TMC after defeat, win in Election.)

 

निवडणुकीत भाजपाच्या पराभवानंतर पक्षात मोठा गोंधळ उडालेला आहे. तृणमूल काँग्रेसमधून (trinamool congress) आलेले अनेक नेते आता परत जाण्याचे मार्ग शोधू लागले आहेत. माजी आमदार सोनाली गुहा, दिपेदू विश्वास यांनी पुन्हा तृणमूलमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याशिवाय अन्य नेत्यांची नावेही चर्चेत आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेत्यांच्या दाव्यानुसार भाजपातून जवळपास 8 जिंकलेले आमदार आणि काही खासदार तृणमूलमध्ये परत येऊ इच्छित आहेत. यामध्ये मुकुल रॉय यांचे नावही आहे. (Month After Trinamool Win, Defectors Who Joined BJP Queue Up To Return)

तृणमूल काँग्रेसमधून आलेल्या लोकांच्या परत जाण्याच्या मुद्द्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्षश दिलीप घोष यांनी सांगितले की, लोकशाहीत हे सुरु असते. काही लोक येतात, हरल्यानंतर परत जातात. काहींना त्यांच्या सुरक्षेची देखील चिंता सतावत आहे, राज्यातील हिंसाचाराच्या राजकारणाला ते घाबरत आहेत. पक्ष वाढविण्यासाठी नवीन लोकांना पक्षात घ्यावे लागते. जिंकले असते तर ठीक होते, हरले म्हणून आता त्यांना पक्षांतराचा पश्चाताप होत आहे. 

टॅग्स :BJPभाजपाWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१west bengalपश्चिम बंगालAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जी