शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

“नेहरूंच्या ‘त्या’ भाषणामुळे अर्थव्यवस्था बिघडली अन् महागाई वाढली”; भाजप नेत्याचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 14:40 IST

भाजपच्या कार्यकाळात महागाई कमी झाली असून, लोकांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे, असे भाजप नेत्याने म्हटले आहे.

ठळक मुद्देदेशातील वाढत्या महागाईचे श्रेय नेहरू कुटुंबालाचकाँग्रेस कार्यकर्त्यांनी सोनिया गांधींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले पाहिजेपंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेला बळकटी दिली

भोपाळ: इंधनदरवाढ, गॅसच्या वाढलेल्या किमती आणि त्यामुळे झालेल्या महागाईविरोधातकाँग्रेससह अन्य विरोधी पक्ष आक्रमक झाले असून, केंद्रातील मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. काँग्रेसची महाराष्ट्र, मध्य प्रदेश यांसह अन्य राज्यांमध्ये इंधनदरवाढ, महागाईविरोधात आंदोलने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील भाजप नेत्याने एक अजब दावा केला असून, देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी केलेल्या भाषणामुळे महागाई वाढल्याचे म्हटले आहे. (bjp vishwas sarang claims inflation due to jawaharlal nehru speech on 15 august 1947)

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळामुळे १३३ कोटींचा चुराडा; केवळ १८ तास कामकाज!

काँग्रेसकडून वाढते इंधनदर आणि इतर मुद्द्यांवरुन आंदोलन करण्यासंबंधी विचारण्यात आले असता मध्य प्रदेशातील वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि भाजप नेते विश्वास सारंग यांनी महागाईचे खापर जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या भाषणावर फोडले असून, अजब दावा केल्याचे सांगितले जात आहे. महागाईची समस्या एका दिवसात उभी राहिलेली नाही. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन केलेल्या भाषणातील चुकांमुळेच अर्थव्यवस्था ढासळण्यास सुरुवात झाली, असा दावा सारंग यांनी यावेळी बोलताना केला. ते भोपाळमध्ये मीडियाशी बोलत होते.

“लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा का देत नाही”; हायकोर्टाचा ठाकरे सरकारला सवाल

वाढत्या महागाईचे श्रेय नेहरू कुटुंबालाच

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अर्थव्यवस्थेला खिळखिळी करत महागाई वाढवण्याचं श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते नेहरु कुटुंब आहे. महागाई एक किंवा दोन दिवसांत वाढत नाही. अर्थव्यवस्थेचा पाया एक किंवा दोन दिवसात उभारला जात नाही. जवाहरलाल नेहरु यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन भाषण देताना केलेल्या चुकांमुळेच देशाची अर्थव्यवस्था खालावली आहे. नेहरुंनी आपली पाश्चिमात्य विचारसरणी लादली आणि ग्रामीण अर्थव्यवस्था संपवली, असा मोठा आरोप सारंग यांनी यावेळी केला. 

...तरच मागणी मान्य होऊ शकेल; मोदी सरकारने Tesla समोर ठेवली ‘ही’ अट!

पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेला बळकटी दिली

मोदी सरकारने गेल्या सात वर्षात अर्थव्यवस्था बळकट केली. भाजपच्या कार्यकाळात महागाई कमी झाली असून, लोकांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे असा दावा करत वास्तविक पाहता काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोनिया गांधींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले पाहिजे, असा खोचक टोला सारंग यांनी लगावला. 

टॅग्स :PoliticsराजकारणInflationमहागाईMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस