शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

तामूलपूर मतदारसंघातील निवडणूक रद्द करा -काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 06:51 IST

आसाममधील तामूलपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे केली. बोडोलँड पीपल्स फ्रंटचे उमेदवार राम दास बसुमातारी गुरुवारी बंडखोरी करून भाजपमध्ये गेले आहेत.

नवी दिल्ली : आसाममधील तामूलपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे केली. बोडोलँड पीपल्स फ्रंटचे उमेदवार राम दास बसुमातारी गुरुवारी बंडखोरी करून भाजपमध्ये गेले आहेत.ज्येष्ठ नेते डॉ. अश्वनी कुमार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयोगाकडे युक्तिवाद केला की, निवडणूक प्रक्रिया पारदर्शी राहील याची काळजी घेतली पाहिजे. माजी केंद्रीय कायदा मंत्री अश्वनी कुमार म्हणाले की, बंडखोरी ही बेकायदा मार्गांनी घडवून आणलेली आहे आणि तीदेखील मतमोजणी सुरू व्हायच्या आधी. निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य, पारदर्शकता आणि एकात्मता अबाधित राहील यासाठी त्याला असलेल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करील याकडे देशाचे लक्ष लागले आहे, असेही अश्वनी कुमार म्हणाले. वाहनात मशीन कशा?भाजप उमेदवाराच्या वाहनात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स (ईव्हीएम्स) गेल्या कशा याची चौकशी करण्याची मागणीही या शिष्टमंडळाने केली. कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदी यांच्या छायाचित्राचा मुद्दा शिष्टमंडळाने यावेळी उपस्थित केला. त्यावर आयोगाने प्रमाणपत्रावरील छायाचित्र काढून टाकण्याचे आदेश जारी केले. 

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१congressकाँग्रेस