शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

"हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील...", मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात भास्कर जाधवांचा तिळपापड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 21:09 IST

Chiplun Flood : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि शहरवासियांच्या व्यथा जाणून घेतल्या.

रत्नागिरी : मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेल्या महापुरामुळे कोकणातील चिपळूण शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नसली तरी प्रचंड वित्तहानी झाली आहे. शहरातील बाजारपेठ पुरामुळे कोलमडली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि शहरवासियांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी भर बाजारपेठेत एक महिला पुरात तिच्या घराचे आणि दुकानाचे नुकसान झाल्याचे ओरडून ओरडून सांगत होती.

या महिलेने तुम्ही काहीपण करा, आमदार, खासदारांचा एक महिन्याचा पगार फिरवा, पण आमचे नुकसान भरून द्या, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले. महिलेच्या या उद्गाराने आमदार भास्कर जाधवांचा तिळपापड झाला. त्यांनी लगेच या महिलेला प्रत्युत्तर दिले. हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील. त्याने काही होणार नाही, असे भास्कर जाधव म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीपेक्षा भास्कर जाधव यांच्या या वागण्याचीच चर्चा अधिक रंगली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच अधिकाऱ्यांकडून पूर परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.

यावेळी पुराच्या काळात आम्हाला मदत मिळाली नाही. पूरपरिस्थितीदरम्यान, मदतीसाठी झालेल्या उशिरासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी चिपळूणवासियांनी केली. तसेच पुरामुळे आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत. आम्हाला या परिस्थितीतून सावरण्यासाठी एकदा कर्जमाफी द्या आणि दोन टक्के दराने कर्ज द्या अशी विनंती चिपळूणमधील व्यापाऱ्यांनी केली.

त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला तुमच्या पायावर कसे उभे करायचे याची जबाबदारी आम्ही घेत आहोत, असे सांगितले. तसेच, तुमचे जे नुकसान झाले आहे. त्याची काळजी करु नका. तुम्हाला तुमच्या पायावर उभे करण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील व्यापाऱ्यांना दिले.

त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ताफा थोडा पुढे सरकला. भर बाजारपेठेत एक महिला पुरात तिच्या घराचे आणि दुकानाचे नुकसान झाल्याचे ओरडून ओरडून सांगत होती. मदतीची याचना करत होती. ही मला रडतच आपल्या भावना व्यक्त करत होती. तिचा हा आक्रोश ऐकून मुख्यमंत्री थोडावेळ थांबले. तिचे म्हणणे ऐकून घेतले आणि सर्व मागण्या पूर्ण करू असे तिला आश्वासन दिले. यावेळी या महिलेने तुम्ही काहीपण करा, आमदार, खासदारांचा एक महिन्याचा पगार फिरवा, पण आमचे नुकसान भरून द्या, असे सांगितले.

या महिलेच्या या उद्गाराने भास्कर जाधवांचा तिळपापड झाला. त्यांनी लगेच या महिलेला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील. त्याने काही होणार नाही. चला चला… बाकी काय… तुझा मुलगा कुठंय… अरे आईला समजव… आईला समजंव… उद्या ये…, असे भास्कर जाधव तावातावाने म्हणाले आणि पुढे निघाले. यावेळी भास्कर जाधव यांचे हातवारे, त्यांचा चढलेला आवाज आणि त्यांची बॉडी लँग्वेज पाहून उपस्थितांना थोडा धक्काच बसला. त्यामुळे चिपळूनमधील मुख्यमंत्र्यांच्या भेटीपेक्षा भास्कर जाधव यांच्या या वागण्याचीच सर्वत्र चर्चा होत असल्याचे दिसून आले.

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवUddhav Thackerayउद्धव ठाकरेchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढा