शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

अजितदादांनी दिलेला शब्द पाळला नाही मात्र मुख्यमंत्र्यांनी ३ जणांची यादी पाठवली; राज्यपाल घेणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 07:19 IST

MPSC रिक्त सदस्यांसाठी राज्यपालांकडे आता आणखी एक यादी, ३१ जुलैपूर्वी नियुक्त करण्याचे दिले होते उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन

ठळक मुद्देमुलाखतीच्या विलंबामुळे आलेल्या नैराश्यातून स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याचे पडसाद विधानसभेत उमटले होतेएमपीएससीमार्फत भरतीची सक्षम व गतिमान व्यवस्था निर्माण केली जाईलतीन पदांसाठी तीन नावे मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविली आहेत

यदु जोशी

मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची सर्व रिक्त पदे ३१ जुलैपर्यंत भरण्यात येतील, हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५ जुलै रोजी दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र, तीन सदस्यांची नावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. 

एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखतीच्या विलंबामुळे आलेल्या नैराश्यातून स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले होते. त्या वेळी एमपीएससीमार्फत भरतीची सक्षम व गतिमान व्यवस्था निर्माण केली जाईल. ३१ जुलैपूर्वी एमपीएससी सदस्यांची रिक्त पदे भरण्यात येतील, असे पवार यांनी विधानसभेत जाहीर केले होते. 

सूत्रांनी सांगितले की, तीन पदांसाठी तीन नावे मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविली आहेत. राज्यपाल या नावांना कधी मान्यता देतात याबाबत उत्सुकता आहे. सदस्य पदासाठी आलेल्या अर्जांची छाननी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती करते. एमपीएससी सदस्य पदासाठीच्या पात्रतेचे निकष ११ सप्टेंबर २०१९ रोजीच्या शासन आदेशात दिलेले आहेत. त्या आधारे ही छाननी करून एका पदासाठी चार नावांची शिफारस मुख्य सचिवांची  समिती मुख्यमंत्र्यांकडे करते व नंतर मुख्यमंत्री त्यातील एक नाव राज्यपालांकडे पाठवतात. या वेळी तीन सदस्यांसाठीची तीन नावे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे पाठविल्याचे कळते. एमपीएससीचे अध्यक्ष सतीश गवई हे पुढील महिन्यात निवृत्त होणार आहेत. त्यामुळे नवे अध्यक्ष निवडण्याची प्रक्रियाही लवकरच सुरू होईल.

शासनाच्या परवानगीची MPSC ला प्रतीक्षागट ‘ब’च्या अधिकाऱ्यांची पदभरती करण्यासाठी संयुक्त सेवा पूर्वपरीक्षा घेण्याकरिता परवानगी द्या, असे पत्र मे २०२१ मध्ये आणि त्यानंतरही एकदा एमपीएससीने राज्य सरकारकडे पाठविले. मात्र, अद्याप शासनाने परवानगी दिलेली नाही. महामारीच्या कायद्यानुसार परीक्षा घेण्यासाठी शासनाची परवानगी लागते. गट ‘ब’च्या अधिकारी पदासाठी ४ लाख उमेदवारांचे अर्ज आलेले होते. 

२०२० च्या पदभरतीचे मागणीपत्रच नाहीएमपीएससीने कोणत्या आणि किती पदांची भरती प्रक्रिया राबवायची याचे मागणीपत्र राज्य शासनाकडून दरवर्षी येते. २०२० मधील पदभरतीचे मागणीपत्र अद्याप शासनाकडून एमपीएससीला गेलेले नाही. एमपीएससीने त्याबाबत दोनवेळा सरकारकडे विचारणा केली. दरवर्षी साधारणत: सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान शासनाकडून मागणीपत्र येत असते. मात्र आता ऑगस्ट आला तरी गेल्या वर्षीचे मागणीपत्र शासनाकडून गेलेले नाही.

जीआर म्हणतो, १५ सप्टेंबर!

शासकीय सेवेतील रिक्त पदे भरण्यासाठीचे प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत विविध विभागांनी एमपीएससीकडे पाठवावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यंतरी एका बैठकीत दिले होते. मात्र, ३० जुलै रोजी शासन आदेश काढण्यात आला की, ३० सप्टेंबरपर्यंत सर्व विभागांनी पदभरतीबाबतची मागणी पत्रे एमपीएससीकडे पाठवावीत.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीMPSC examएमपीएससी परीक्षा