शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा संजय राऊतांवर भरवसा; शिवसेनेत पुन्हा एकदा दिली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 09:46 IST

क्राईम पत्रकार म्हणून संजय राऊतांनी पत्रकारिता क्षेत्रात स्वत:चा दबदबा निर्माण केल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्यावर सामनाची जबाबदारी दिली.

ठळक मुद्देदेशपातळीपासून राज्यातील कोणत्याही प्रश्नावर संजय राऊत यांनी नेहमी पक्षाची बाजू ठामपणे मांडलीराज्याच्या राजकारणात जी उलथापालथ झाली त्यात सगळ्यात महत्त्वाचा वाटा हा संजय राऊत यांचाचअनेकदा संजय राऊत यांनी आक्रमक शैलीतून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

मुंबई -  सध्या राजकीय पटलावर शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. विरोधकांना सळो की पळो सोडणाऱ्या संजय राऊतांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला भरवसा असल्याचं पुन्हा दाखवून दिले आहे. कंगना प्रकरणावरुन संजय राऊत यांनी आक्रमक शैली सगळ्यांनीची पाहिली आहे. संजय राऊतांवर चहुबाजूने टीका होत असताना शिवसेनेने संजय राऊतांना मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आहे.

शिवसेनेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली. यात संजय राऊत यांनी मुख्य प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत १० प्रवक्त्यांची नेमणूकही उद्धव ठाकरेंनी केली आहे. यामध्ये खासदार अरविंद सावंत, कोल्हापूरातील खासदार धैर्यशील माने, खासदार प्रियंका चतुर्वेदी, आमदार नीलम गोऱ्हे, मंत्री गुलाबराव पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, आमदार सुनील प्रभू, आमदार प्रताप सरनाईक आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा समावेश करण्यात आला आहे.

विरोधकांवर बरसणारे संजय राऊत

क्राईम पत्रकार म्हणून संजय राऊतांनी पत्रकारिता क्षेत्रात स्वत:चा दबदबा निर्माण केल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्यावर सामनाची जबाबदारी दिली. याच काळात शिवसेनेकडून संजय राऊत यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले. मातोश्रीच्या अगदी जवळ असणाऱ्या नेत्यांपैकी संजय राऊत यांचा समावेश आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेला सामना आणि त्यातील अग्रलेख याद्वारे अनेकदा संजय राऊत यांनी आक्रमक शैलीतून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

देशपातळीपासून राज्यातील कोणत्याही प्रश्नावर संजय राऊत यांनी नेहमी पक्षाची बाजू ठामपणे आणि आक्रमकपणे मांडली आहे. इतकचं नाही तर अलीकडे राज्याच्या राजकारणात जी उलथापालथ झाली त्यात सगळ्यात महत्त्वाचा वाटा हा संजय राऊत यांचाच आहे. संजय राऊत यांच्यामुळे इतिहासात कधीही न घडलेलं समीकरण राज्यात साकारलं गेले. भाजपावर जहरी टीकास्त्र, खुमासदार शैलीत फटकारे यामुळे संजय राऊत नेहमी विरोधकांच्या निशाण्यावर राहिले आहेत. संजय राऊत यांच्यामुळेच राज्यात काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचं सरकार आलं.

गेल्या महिनाभरापासून संजय राऊत पुन्हा चर्चेचा विषय ठरले आहेत. अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात शिवसेनेवर होणारी टीका रोखण्यासाठी संजय राऊत पुढे सरसावले आहेत. कंगना राणौत प्रकरणी संजय राऊत यांनी थेट त्यांच्या शैलीतून कंगनाला फटकारलं आहे. कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील संघर्षाने राजकीय वातावरण पेटलं आहे. त्यामुळे शिवसेनेने राऊतांची मुख्य प्रवक्तेपदी नेमणूक केल्याने आगामी काळात ते विरोधकांवर पुन्हा बरसणार आहेत. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाKangana Ranautकंगना राणौत