शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

काँग्रेस कार्यकर्त्यांनीच केली प्रवाशांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 05:41 IST

प्रचारादरम्यान ‘मोदी मोदी’च्या घोषणा देणाऱ्या सामान्य प्रवाशांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी बोरीवली येथे मारहाण केली.

मुंबई : प्रचारादरम्यान ‘मोदी मोदी’च्या घोषणा देणाऱ्या सामान्य प्रवाशांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी बोरीवली येथे मारहाण केली. मारहाण करणारे काँग्रेसचेच असल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. या साºया प्रकारात एक महिला प्रवासी जखमी झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाºया ऊर्मिला मातोंडकर यांना सामान्य नागरिकांच्या अभिव्यक्तीने इतका त्रास का झाला, असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी केला.अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचा कांगावा ऊर्मिला मातोंडकर यांनी केला होता. आता मातोंडकर यांच्यासमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी मोदी अशा घोषणा देणाºया युवकांना मारहाण केली. यात एका युवतीलाही मार लागला. अभिव्यक्तीवर गळे काढणारेच सामान्यांच्या अभिव्यक्तीची गळचेपी करत आहेत, असे तावडे म्हणाले.बोरीवलीमधील घटनेत काँग्रेसचे कार्यकर्ते राजेश निर्मल व अन्य कार्यकर्त्यांनी सामान्य प्रवाशांना मारहाण केल्याचे न्यूज चॅनेलच्या फूटेजमध्ये दिसत आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम्ही बोरीवली पोलीस ठाण्यामध्ये केल्याचे सांगतानाच तावडे म्हणाले की, तुमच्या समोर तुमच्याच कार्यकर्त्यांनी एका महिलेवर हात उगारणे हे दुर्दैवी आहे. प्रचारासाठी ऊर्मिला मातोंडकर यांनी हवे तितके पोलीस संरक्षण घ्यावे. आवश्यक असल्यास बाउन्सरही घ्या. पण याच्या आधारे तुम्हाला मते मिळणार नाहीत, असा टोला मारला.>प्रियांकांना विस्मरणनरेंद्र मोदी राज्यघटना बुडवायला निघाले आहेत, असे विधान करणाºया प्रियांका गांधी यांच्यावर टीका करताना तावडे म्हणाले की, इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावून मोठा गुन्हा केला होता. जी राज्यघटना डॉ. आंबेडकर यांनी तयार केली, त्यावर इंदिरांजींनी आघात केला होता, याचे बहुतेक प्रियांका गांधी यांना विस्मरण झाले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या यांच्या भूलथापांना नांदेडची जनता बळी पडणार नसल्याचेही तावडे म्हणाले.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019