शहरं
Join us  
Trending Stories
1
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
3
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
4
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
5
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
6
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
7
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
8
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
9
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
10
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
11
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
12
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत
13
रेल्वे घातपात रोखण्यासाठी एनआयए, राज्यांशी चर्चा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य
14
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
15
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
16
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
17
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
18
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
19
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
20
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...

“होय, आताच्या घडीला भाजपला सशक्त पर्याय नाही”; कपिल सिब्बल यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 7:38 PM

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाला घरचा अहेर दिला असून, भाजपला दुसरा सशक्त पर्याय नाही, अशी कबुली दिली आहे.

ठळक मुद्देकपिल सिब्बल यांचा पुन्हा एकदा काँग्रेसला घरचा अहेरज्येष्ठ आणि युवा यांमध्ये समन्वय साधण्याची गरजभाजपसमोर काँग्रेसच उत्तम पर्याय म्हणून उभा राहू शकतो - सिब्बल

नवी दिल्ली: पुढील काही महिन्यात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. भाजपने आतापासून या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राहुल गांधींच्या जवळचे मानले जाणारे जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उत्तर प्रदेशमधील राजकारणात खळबळ उडाली. यानंतर काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज आहे, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाला घरचा अहेर दिला असून, भाजपला दुसरा सशक्त पर्याय नाही, अशी कबुली दिली आहे. (congress kapil sibal says country needs a strong credible opposition)

पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षाची वाटचाल आणि अन्य गोष्टींबाबत स्पष्ट विचार मांडले आहेत. काँग्रेस नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून  पक्षांतर्गत अनेक सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे मत सिब्बल यांनी व्यक्त केले आहे. 

“नाना पाटोलेंना मुख्यमंत्री, राहुल गांधींना वाटतंय पंतप्रधान व्हावसं, पण...”; भाजपचा टोला

भाजपला सशक्त पर्याय नाही

आताच्या घडीला देशात भारतीय जनता पक्षाला सशक्त पर्याय नाही, याची कबुली देत सिब्बल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा कार्यभार हाकण्याचा नैतिक अधिकार गमावलेला आहे. भाजपसमोर काँग्रेसच एक उत्तम पर्याय म्हणून उभे राहू शकते, असा विश्वास सिब्बल यांनी व्यक्त केला आहे. तसेच देशाला मजबूत, विश्वासार्ह विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. काँग्रेस पक्षाने आपली सक्रीयता ही दाखवून देण्याची वेळ आली आहे. काँग्रेस पक्षाला संघटनात्मक निवडणुका घेण्याची गरज आहे. केंद्र आणि राज्य स्तरावर व्यापक सुधारणा घडवण्याचीही आवश्यकता आहे. याशिवाय पक्षातील ज्येष्ठ नेते आणि युवा नेते यांच्यात योग्य समन्वय साधण्याची गरज आहे, असे कपिल सिब्बल यांनी नमूद केले. 

दुसऱ्यांचे ऐकल्याशिवाय काहीही टिकू शकत नाही

यापूर्वीही कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षाच्या काही गोष्टींवर आक्षेप नोंदवला होता. मला खात्री आहे की, नेमकी समस्या काय आहेत, याची नेतृत्वाला माहिती आहे. माझी एवढीच अपेक्षा आहे आहे की, नेतृत्व लोकांचे ऐकेल. कारण ऐकल्याशिवाय काहीही तग धरू शकत नाही. पक्षांतर्गत समस्यांचे निराकरण केले गेले नाही हे खरे आहे. या समस्यांची शक्य तितक्या लवकर दखल घेतली गेली पाहिजे, या शब्दांत कपिल सिब्बल यांनी पक्षनेतृत्वाचे अप्रत्यक्षरित्या कान टोचले आहेत. 

“... तरच फायदा होईल, मोर्चा काढून निष्पन्न काय होणार”: अशोक चव्हाण

दरम्यान, काँग्रेसने पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे मोठा पक्ष व्हायला हवे. त्यासाठी पुनर्रचना करणे गरजेचे आहे. पक्षप्रमुखाने ऐकलेच नाही किंवा ऐकणे सोडून दिले, तर संघटना कोसळेल. पक्षाने आमचे ऐकावे, एवढीच आमची अपेक्षा आहे, असे सांगत तुम्ही जर ऐकले नाहीत, तर तुमच्यावर वाईट परिस्थिती ओढवेल, असा सूचक इशाराही सिब्बल यांनी दिला. 

टॅग्स :Politicsराजकारणkapil sibalकपिल सिब्बलcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीElectionनिवडणूक