शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
4
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
5
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
6
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
7
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
8
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
9
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
10
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
11
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
12
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
13
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
14
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
15
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
16
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
17
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
18
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
19
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
20
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...

“राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला?”; नाना पटोलेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 2:28 PM

राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला? राहुल गांधींना संपवण्याचा कट तर नाही ना, असा खळबळजनक आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

ठळक मुद्देराहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला?राहुल गांधींना संपवण्याचा कट तर नाही ना?काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

नाशिक:काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी नुकतेच जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते. श्रीनगर येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांशी संवादही साधला. पण, राहुल गांधी थांबले होते, तिथपासून केवळ ५०० मीटरवर बॉम्ब हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. यावरून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शंका उपस्थित केली आहे. राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला? राहुल गांधींना संपवण्याचा कट तर नाही ना, असा खळबळजनक आरोप नाना पटोले यांनी केला आहे. (congress nana patole alleged modi govt over rahul gandhi tour and jammu kashmir bomb blast)

स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी 'व्यर्थ न हो बलिदान' हा कार्यक्रम हुतात्मा स्मारकात घेण्यात आला. यावेळी पटोले बोलत होते. कार्यक्रमास राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या सुरक्षेसंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. 

“BJP ला पराभूत करायचे असेल, तर काँग्रेसने सर्वांत आधी...”; सिब्बलांनी सांगितला रामबाण उपाय!

राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला

राहुल गांधी जम्मू काश्मीरमध्ये गेले आहेत. तिथे ते गेले अन् बॉम्बस्फोट झाला. ते तिथून गेले होते म्हणून बरे झाले. राहुल गांधी जिथे थांबले होते तिथून ५०० मीटर अंतरावर हा बॉम्बस्फोट झाला. जम्मू काश्मिरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू असून तेथील सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. राहुल हे देशभरातील जनतेचा आवाज बनले असून, हा हल्ला म्हणजे त्यांना संपविण्याचा कट तर नाही ना, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला.

“आरक्षणाच्या मुद्द्यावर नारायण राणे, रावसाहेब दानवे का बोलले नाहीत?”: संजय राऊत

भाजपपासून काँग्रेसच देशाला वाचवू शकते

नोटाबंदी झाल्यावर दहशतवाद संपेल असं यांनी सांगितलं होतं. पण मग दहशतवाद संपला का? नोटाबंदीचं सोडून द्या पण मग तुमच्याकडे इतकी मोठी यंत्रणा असताना दहशतवादी राहुल गांधी होते तिथपर्यंत कसे काय येऊ शकले, अशी विचारणा करत गांधी घराणे देशाचा आवाज बनले असून लोकशाहीची मूल्ये आणि संविधानाची मोडतोड करणाऱ्या भाजपपासून काँग्रेसच देशाला वाचवू शकते, असे नाना पटोले म्हणाले.

Air India चा टॉवर ठाकरे सरकार विकत घेणार? कंपनीशी खरेदीबाबत चर्चा सुरू 

दरम्यान, ब्रिटिश राजवटीत जालियनवाला बाग हत्याकांडात अनेकांचा बळी गेला. परंतु, कोरोना संकट काळात पवित्र गंगा नदीतून अनेक हिंदू बांधवांचे मृतदेह वाहून गेले. गंगा नदी मलिन करण्याचे काम सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारामध्ये मश्गूल होते. देशात चाललेले मृत्यूचे तांडव बघत होते. जालियनावाला बागमध्ये जेवढे लोक मारले गेले नाहीत तेवढे बळी करोना काळात केंद्र सरकारने घेतल्याचा आरोपही पटोले यांनी केला. 

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेRahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीNashikनाशिकJammu Kashmirजम्मू-काश्मीर