शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
कधीकाळी जिगरी दोस्त होते इराण-इस्रायल; जानी दुश्मन कसे बनले? सद्दामच्या इराकवर केलेला हल्ला
3
१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
4
ख्रिस गेलचा PM मोदींना 'नमस्कार'! भारतीयांना ती शैली भावली; 'युनिव्हर्सल बॉस'ची लक्षवेधी पोस्ट 
5
Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!
6
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
7
अजित पवारांनी तटकरे, पटेलांसह घेतली अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
8
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
9
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स
10
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
11
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
12
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
13
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
14
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
15
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
16
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
17
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
18
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
19
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
20
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 10:03 AM

Maha Vikas Aghadi Maharashtra Elections : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाला उत्तर देताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मित्रपक्षांबद्दल महत्त्वाचे भाष्य केले. 

Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण, यावेळी पुन्हा महाविकास आघाडीला बहुमत मिळाले, तर मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाभोवती गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. याच मुद्द्यावर बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, "एका दिवसासाठी का होईना, पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे." 

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण? याबद्दल वेगवेगळे आडाखे मांडले जात आहेत. याबद्दल एका मुलाखतीत अंबादास दानवे यांनी भाष्य केले. 

"भाजपासोबत असतो तरीही मंत्रिपदे मिळाली असती"

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून नको, असं वाटतंय का? या प्रश्नाला उत्तर देताना अंबादास दानवे म्हणाले, "असं नाही. उलट त्यांनी मिळूनच उद्धवजींना मुख्यमंत्री बनवलं होतं. आम्ही शिवसेनेने ही भूमिका घेतली म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेवर बसायला मिळाले."

शंभर टक्के उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील -दानवे

"शिवसेनेने ही भूमिका घेतली म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना सत्तेवर बसायला भेटले. काँग्रेस तीन नंबर होती. हेही लक्षात ठेवले पाहिजे. पण, उद्धव ठाकरेंनी भूमिका घेतली म्हणून यांच्या वाट्याला मंत्रि‍पदे आली. तसे तर आम्हाला त्यांच्याकडूनही (भाजपा) मंत्रि‍पदे मिळाली असती ना? भाजपाबरोबर राहिलो असतो, तर...", असा उलट सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केला. "यावेळीही शंभर टक्केच उद्धव ठाकरेंच मुख्यमंत्री असतील", असेही अंबादास दानवे म्हणाले. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे