शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
4
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
5
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
6
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
7
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
8
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
9
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
10
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
11
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
12
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
13
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
14
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
15
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
16
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
17
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
18
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
19
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
20
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट

'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 10:06 IST

Maha Vikas Aghadi Maharashtra Elections : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाला उत्तर देताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मित्रपक्षांबद्दल महत्त्वाचे भाष्य केले. 

Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण, यावेळी पुन्हा महाविकास आघाडीला बहुमत मिळाले, तर मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाभोवती गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. याच मुद्द्यावर बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, "एका दिवसासाठी का होईना, पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे." 

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण? याबद्दल वेगवेगळे आडाखे मांडले जात आहेत. याबद्दल एका मुलाखतीत अंबादास दानवे यांनी भाष्य केले. 

"भाजपासोबत असतो तरीही मंत्रिपदे मिळाली असती"

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून नको, असं वाटतंय का? या प्रश्नाला उत्तर देताना अंबादास दानवे म्हणाले, "असं नाही. उलट त्यांनी मिळूनच उद्धवजींना मुख्यमंत्री बनवलं होतं. आम्ही शिवसेनेने ही भूमिका घेतली म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेवर बसायला मिळाले."

शंभर टक्के उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील -दानवे

"शिवसेनेने ही भूमिका घेतली म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना सत्तेवर बसायला भेटले. काँग्रेस तीन नंबर होती. हेही लक्षात ठेवले पाहिजे. पण, उद्धव ठाकरेंनी भूमिका घेतली म्हणून यांच्या वाट्याला मंत्रि‍पदे आली. तसे तर आम्हाला त्यांच्याकडूनही (भाजपा) मंत्रि‍पदे मिळाली असती ना? भाजपाबरोबर राहिलो असतो, तर...", असा उलट सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केला. "यावेळीही शंभर टक्केच उद्धव ठाकरेंच मुख्यमंत्री असतील", असेही अंबादास दानवे म्हणाले. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे