शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

“तुमच्या सरकारमधील मंत्र्यांना किती मुलं ते आधी सांगा”; माजी मंत्र्यांची योगींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 17:54 IST

लोकसंख्या नियंत्रणासाठी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने एक विधेयक आणले आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला लागल्यात.

लखनऊ: लोकसंख्या नियंत्रणासाठी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने एक विधेयक आणले आहे. राज्य विधी आयोगाने उत्तर प्रदेश लोकसंख्या विधेयक २०२१ चा मसुदा तयार केला आहे. मात्र, यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला लागल्या असून, योगी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. यातच आता काँग्रेसच्या एका माजी केंद्रीय मंत्र्यांनी योगी सरकारवर निशाणा साधत तुमच्या सरकारमधील मंत्र्यांना किती मुले ते आधी सांगा, अशी विचारणा केली आहे. (congress salman khurshid criticised yogi govt over population control law)

योगी सरकारने आणलेल्या लोकसंख्या नियंत्रण विधेयकानुसार, दोनपेक्षा अधिक मुलंबाळं असणाऱ्या नागरिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढता येणार नाहीत, सरकारी नोकरीसाठी ते पात्र नसतील, तसंच पदोन्नती तसंच सरकारकडून मिळणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही. यावरून काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीयमंत्री सलमान खुर्शीद यांनी योगी सरकारवर खोचक टीका केली आहे. 

BPCL खासगीकरणानंतर ८.४ कोटी LPG ग्राहकांना गॅस मिळणार नाही? पाहा, सरकारी नियम

त्यानंतरच विधेयक मंजूर करा

सलमान खुर्शीद यांनी कोरोना तपासणी केंद्राचे उद्घाटन केले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी योगी सरकारवर टीकास्त्र सोडले. लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याआधी सरकारने जाहीर करावे की, त्यांच्या मंत्र्यांना किती मुले आहेत. त्यानंतर हे विधेयक मंजूर करावे, असे खुर्शीद यांनी म्हटले आहे. 

जसे विचार करणार, तसेच बोलणे

सलमान खुर्शीद यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मनात जसे भाव, तसेच विचार आणि कृत्य केली जातात, या शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी पलटवार केला आहे. दरम्यान, राज्य विधी आयोग सध्या राज्यातल्या लोकसंख्या नियंत्रण, स्थिरीकरण आणि कल्याण यासाठी काम करत असून, १९ जुलैपर्यंत यावर जनतेची मते मागवण्यात आली आहेत.  

टॅग्स :Politicsराजकारणyogi adityanathयोगी आदित्यनाथcongressकाँग्रेसsalman khurshidसलमान खुर्शिदBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश