शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भाजपाला इशारा; “महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ झाल्यास...”

By प्रविण मरगळे | Updated: February 9, 2021 08:59 IST

Nana Patole Target Devendra Fadnavis: काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार फुटले जाण्याची चर्चा आहे, परंतु भाजपाने स्वत:चे आमदार सांभाळावे, जी काही रणनीती असेल ती करावी

ठळक मुद्देएकेकाळी अंडरवर्ल्डची दहशत होती, दबावात आणून ते सेलिब्रिटीला हवं तसं वागायला लावत होतेशेती प्रश्नाची ज्यांना ABC माहिती नाही अशा रेल्वे मंत्र्यांना शेतकऱ्यांसोबत चर्चा करायला लावणं हा विश्वासघात आहे.लोकांना विचलित करण्याचं काम भाजपा नेहमी करतात. सत्तेत बसणाऱ्यांनी देशासमोर जे प्रश्न आहेत त्याकडे लक्ष द्यावे

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. जास्त दिवस विरोधी पक्षात राहायचं नाही असं विधान माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, या विधानावरून काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांना समाचार घेतला आहे.

पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आमचे मित्र आहेत, ते फक्त बोलण्यात एक्सपर्ट आहेत, मी भविष्यकार नाही, ते जास्त पाहतात. पण महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस झाल्यास महाराष्टातून भाजपा संपुष्टात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच शिवसेना-भाजपा यांच्यात बंद खोलीत जे झालं त्याबद्दल बोलणार नाही. मात्र सव्वा वर्ष झाली आणि अमित शहा आज बोलतायेत, शेतकरी, महागाई, बेरोजगारी असे विविध प्रश्न आहेत, त्यावरून लोकांना विचलित करण्याचं काम भाजपा नेहमी करतात. सत्तेत बसणाऱ्यांनी देशासमोर जे प्रश्न आहेत त्याकडे लक्ष द्यावे असं पटोलेंनी सांगितले. (Congress Nana Patole Criticized BJP Devendra Fadnavis)

पंतप्रधान, गृहमंत्री खोटं बोलतात

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना नरेंद्र मोदींनी राज्यसभेत जे सांगितलं त्याने आश्चर्य वाटलं, मन की बात सारखं संसदेत भाषण करतात, जीएसटी कायद्याला भाजपाने विरोध केला होता, मात्र त्यांच्या फायद्याचं आहे अशाप्रकारे जीएसटी कायदा आणला. काही लोकांच्या फायद्यासाठी कृषी कायदा आणला आहे. शेती प्रश्नाची ज्यांना ABC माहिती नाही अशा रेल्वे मंत्र्यांना शेतकऱ्यांसोबत चर्चा करायला लावणं हा विश्वासघात आहे. पंतप्रधान, गृहमंत्री खोटं बोलतात हे जनतेला माहिती आहे. शेतकऱ्यांना सभागृहातून आवाहन करण्यापेक्षा स्वत: तुम्ही चर्चेला जावं असं नाना पटोले म्हणाले.

अंडरवर्ल्डसारखं भाजपा काम करतेय

एकेकाळी अंडरवर्ल्डची दहशत होती, दबावात आणून ते सेलिब्रिटीला हवं तसं वागायला लावत होते, मात्र आज भाजपा सरकार अंडरवर्ल्ड सारखं काम करत आहे, मूळ मुद्दयावरून लक्ष हटवण्यासाठी सेलिब्रिटींना ट्विट करायला लावलं, पण कोणत्याही दबावाला झुकून सेलिब्रिटींनी अशाप्रकारे ट्विट करणं योग्य नाही. देश त्यांच्याकडे आयकॉन म्हणून पाहतो, त्यांनी मर्यादेत राहावं असंही पटोलेंनी सांगितले.

विधानसभा अध्यक्षपदाची बिनविरोध परंपरा कायम राहावी

आगामी काळात होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हायला हवी, मात्र यासाठी भाजपा रणनीती आखत आहे, काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार फुटले जाण्याची चर्चा आहे, परंतु भाजपाने स्वत:चे आमदार सांभाळावे, जी काही रणनीती असेल ती करावी, परंतु विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची बिनविरोध परंपरा कायम राहावी असं विधान नाना पटोलेंनी केले.

उपमुख्यमंत्रिपदाची मागणी नाही

काँग्रेस उपमुख्यमंत्रिपद मागत नाही, ओबीसी नेते उपमुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक नाहीत, ही जनतेची मागणी असेल तर त्याला पक्ष म्हणून आम्ही रोखू शकत नाही. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना जो किमान समान कार्यक्रम ठरला त्यानुसार सरकार पुढे वाटचाल करेल असं सांगत नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहील हे स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसAmit Shahअमित शहाShiv Senaशिवसेना