शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

Coronavirus: “आजारी बायको जमिनीवर लोळत होती पण बेड मिळाला नाही”; भाजपा आमदार हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 14:41 IST

आमदाराच्या पत्नीची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये ७ मे रोजी उपचारासाठी दाखल केले.

ठळक मुद्देपत्नीला जवळपास ३ तास जमिनीवरच झोपवावं लागलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून बेड उपलब्ध झाला. एसएन मेडिकल कॉलेजमध्ये बायकोवर चांगल्यापद्धतीने उपचार होत नाहीत. माझ्या बायकोच्या तब्येतीबाबत कोणीही काही सांगत नाही. तिला जेवण मिळत नाही, पाणी नाही

फिरोजाबाद – यूपीच्या फिरोजाबाद जनपद येथील आमदार रामगोपाल उर्फ पप्पू लोधी हे ३० एप्रिल रोजी कोरोना संक्रमित झाले होते. त्यांच्यासोबत पत्नी संध्या लोधी यादेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. सुरुवातीला यांना फिरोजाबाद येथील आयसोलेशन वार्डात दाखल केले होते. आमदार रामगोपाळ उर्फ पप्पू लोधी यांची तब्येत बरी झाल्यानंतर त्यांना शनिवारी आयसोलेशन वार्डातून डिस्चार्ज मिळाला.

परंतु आमदाराच्या पत्नीची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये ७ मे रोजी उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी पप्पू लोधी यांच्या म्हणण्यानुसार पत्नीला जवळपास ३ तास जमिनीवरच झोपवावं लागलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून बेड उपलब्ध झाला. आता आमदाराच्या पत्नीची अवस्था कशी आहे हे डॉक्टरांनी सांगितले नाही.

भाजपा आमदाराने सांगितले की, एसएन मेडिकल कॉलेजमध्ये बायकोवर चांगल्यापद्धतीने उपचार होत नाहीत. जर आमदाराच्या बायकोला जमिनीवर झोपावं लागलं असेल तिला उपचार वेळेत मिळत नसतील तर सर्वसामान्य जनतेची काय अवस्था असेल ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माझ्या बायकोच्या तब्येतीबाबत कोणीही काही सांगत नाही. तिला जेवण मिळत नाही, पाणी नाही अधिकारी आणि डॉक्टरही काय बोलत नाही असा आरोप त्यांनी केला.

दिल्ली, महाराष्ट्र यासारख्या राज्याप्रमाणे उत्तर प्रदेश कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. सर्वाधिक लखनौ, कानपूर अशा मोठ्या शहरांची अवस्था बिकट झाली आहे. मागील २४ तासांत यूपीत २६ हजार ८४७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. लखनौमध्ये सर्वाधिक २ हजार १७९ नवे कोरोना रुग्ण आढळले. सध्या यूपीत एकूण सक्रीय रुग्णांची संख्या २ लाख ४५ हजार ७३६ इतकी आहे. तर कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या गेल्या २४ तासांत २९८ इतकी नोंदवण्यात आली आहे.

आम्ही हतबल ठरतोय; भाजप आमदाराकडून योगी सरकारचे वाभाडे

लोकांचे मृत्यू होत आहेत आणि त्यांचे जीव वाचवण्याची इच्छा असूनही आम्ही काहीच करू शकत नाही, अशा भावना भाजपा आमदार लोकेंद्र प्रताप सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे पत्रातून व्यक्त केल्या आहेत. लोकांचे मृत्यू होत आहेत आणि मदत करायची असूनही आम्हाला मदत करता येत नाही, असं सिंह यांनी पत्रात नमूद केलं आहे. कानपूरचे खासदार सत्यदेव पचौरी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना पत्र लिहून जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती दिली आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. कोरोनाचा कहर थांबत नाहीए. आम्ही असहायपणे आपल्या माणसांना मरताना बघत आहोत. कोरोनाच्या संकटापासून एकही गाव वाचलेलं नाही, असं सिंह यांनी पत्रात म्हटलं आहे. लखीमपूरमध्ये ऑक्सिजनचा खूप मोठा तुटवडा आहे. त्यामुळे कित्येकांचा जीव जातोय. तहसील स्तरावर सामुदायिक आरोग्य केंद्रावर ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे, असं आमदारांनी पत्रात पुढे नमूद केलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ