शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

UP Election 2022: “ओवेसी यांना एक सभ्य माणूस समजत होते, पण...”; उमा भारतींचे टीकास्त्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 13:44 IST

UP Election 2022: भाजप नेत्या आणि माजी केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी एमआयएमचे असदुद्दीने ओवेसी यांच्यावर टीका करत, त्यांना सभ्य माणूस समजत होते, असे म्हटले आहे.

ठळक मुद्देओवेसी यांना एक सभ्य माणूस समजत होतेयापुढे उत्तर प्रदेशात यापुढे असं काही खपवून घेणार नाहीउमा भारतींचे बसप, राम मंदिरावरून टीकास्त्र

लखनऊ: येत्या काही महिन्यांत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आतापासूनच सर्व राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यात सर्वांत आघाडीवर भाजप असल्याचे दिसत असून, भाजपला पराभूत करण्यासाठी काही पक्षांनी एकत्र आले आहेत. यातच आता भाजप नेत्या आणि माजी केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी एमआयएमचे असदुद्दीने ओवेसी यांच्यावर टीका करत, त्यांना सभ्य माणूस समजत होते, असे म्हटले आहे. (up election 2022 uma bharti criticised asaduddin owaisi over politics in uttar pradesh)

उमा भारती म्हणाल्या की, अँटी मजनू स्क्वॉड आठवतंय का, यासंदर्भात ओवेसी यांची बोलती बंद व्हायची. असदुद्दीन ओवेसी यांना एक सभ्य व्यक्ती समजत होते. मात्र, यापुढे उत्तर प्रदेशात असं काही खपवून घेणार नाही, असा इशाराच उमा भारती यांनी दिला आहे. ओवेसी यांनी अलीकडेच म्हटले होते की, उत्तर प्रदेशात लैला बनल्यासारखे वाटत आहे. कारण, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मजनूसारखे त्यांची आठवण काढत असतात. यासंदर्भात उमा भारती यांनी ओवेसींना सुनावले आहे. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. 

आता पेट्रोल आणि डिझेल एकाच दराने मिळणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

मायावती स्वतः बाहेर फिरून चर्चा करत नाही

मायावती यांनी उत्तर प्रदेशात ब्राह्मण संमेलन आयोजित करण्यावरूनही उमा भारती यांनी टीका केली आहे. मायावती स्वतः बाहेर पडत नाही आणि ब्राह्मण संमेलने घेत आहेत. हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. राम मंदिर मुद्द्यावरूनही उमा भारती यांनी सतीश मिश्रा यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी जातीने अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनासाठी उपस्थित होते. रामलल्लाला त्यांनी साष्टांग दंडवतही घातला. भव्य राम मंदिर होणार यात कोणतेच दुमत नाही. पण, हेच बसपवाले राम मंदिराच्या जागी शौचालय बांधण्याची तयारी करत होते, असा हल्लाबोल उमा भारती यांनी केला. 

लोकसभेत खासदारांचे संख्याबळ १००० होणार? मोदी सरकारचा प्रस्ताव; काँग्रेसचा मोठा दावा

भाजपच्या जागा नक्कीच वाढतील

मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशमध्ये नक्कीच जास्त जागा मिळतील. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनात आणि योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात लढल्या जाणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळेल, असा विश्वास उमा भारती यांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणUttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकUma Bhartiउमा भारतीyogi adityanathयोगी आदित्यनाथAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी