शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

युतीच्या मंत्र्यांसह निवडणूक अधिकाऱ्यांनाही हायकोर्टात खेचणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 01:36 IST

बविआचे शिट्टी हे चिन्ह तिला मिळू न देण्या जबाबदार असणा-या युती सरकारच्या मंत्र्यांना व त्यांना साथ देणा-या अधिकाऱ्यांना आपण कोर्टात खेचणार आहोत अशी माहिती बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी लोकमतला रविवारी दिली.

वसई : बविआचे शिट्टी हे चिन्ह तिला मिळू न देण्या जबाबदार असणा-या युती सरकारच्या मंत्र्यांना व त्यांना साथ देणा-या अधिकाऱ्यांना आपण कोर्टात खेचणार आहोत अशी माहिती बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी लोकमतला रविवारी दिली.पालघर निवडणूक अधिका-यांंनी रात्री उशीरा निवडणूक चिन्ह दिलं, मात्र यात केवळ चिन्हासाठी शिवसेना-भाजपच्या मंत्र्यांनी घाणेरडं राजकारण केलं असल्याचा आरोप त्यांनी केला. आमच्या सोबत गेल्या वीस वर्षापासून असलेल्या शिट्टीची फुरफुर्र थांबवलीत पण आता मिळालेल्या रिक्षाची भुर्रभुर्र कशी थांबवणार असा मिश्कील प्रश्न बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी विचारला आहे. आम्हाला शिट्टी ऐवजी आॅटो रिक्षा हे चिन्ह मिळालंय. सर्वसामान्यांची रिक्षा निशाणी मिळाल्यामुळे जिल्ह्यातील रिक्षा चालक मात्र आनंदी आहेत. कारण आपली रिक्षा संसदेत जाणार, त्यामुळे अनेक नवे कार्यकर्ते आंम्हाला एका रात्रीत मिळाले. संपूर्ण जिल्हातील रिक्षा चालक व संघटनांचे सहकार्य व प्रचारात मदत मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला. महायुती विरोधात महाआघाडीत थेट लढत होत असतांना भूमिसेना आदिवासी एकता परिषदेचे अपक्ष उमेदवार दत्ताराम करवट यांनी यांनी बरीच मते आपल्याला मिळणार असल्याचा दावा केला आहे. सेना-भाजपा महायुतीची मते जर दत्ताराम करवट यांना मिळत असतील तर ती निर्णायक ठरू शकतील असे त्यांनी सांगीतले. फायदा व नुकसान कोणीही उभे राहिल्याने होत नाही असा टोला त्यांनी हाणला. पालघर जिल्हात होऊ घातलेले पाच ते सहा प्रकल्प ज्याचा सर्वसामान्यांना काडीमात्र फायदा नाही त्याबाबत महानगरपालिकेत सर्वानुमते ठराव करून याअगोदरच विरोध दर्शवला आहे. त्यात बडोदा-मुंबई एक्सप्रेस हायवे, वाढवण बंदर, बूलेट ट्रेन, दिल्ली-मुंबई कॅरिडॉर, वसई-उरण रस्ता या प्रोजेक्टना आमचा विरोध कायम असणार असल्याचे त्यांनी सांगीतले. पालघर जिल्हात बविआ हा पक्ष जुना आहे. त्याचे वसई, नालासोपारा व बोईसर विधानसभा क्षेत्रात तीन आमदार आहेत. त्यामूळे या पालघर लोकसभा निवडणूकीत बालेकिल्ला असलेल्या या तीन विधानसभा क्षेत्रात होणाºया मतदानाच्या ७० टक्के मतदान हे बहुजन विकास आघाडीच्या बाजूने होणार असल्याचा दावा त्यांनी केला. जिल्हात कुपोषणाचा प्रश्नही गंभीर आहे. शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्याअगोदर त्या मधल्या मध्ये लाटणारे अधिकारी व मंत्री कोण आहेत, असा सवाल त्यांनी केला.>रिक्षा निशाणी बविआला फायद्याची ठरणार असल्याचा दावाशिट्टी हे चिन्ह न मिळण्यासाठी भाजप-शिवसेनेने सत्तेचा पूर्ण गैरफायदा उचलून निवडणूक अधिकाºयांवर दबाव टाकला. त्यामूळे बविआला रिक्षा हे निवडणूक चिन्ह मिळाले.पण हीच रिक्षा चिन्ह बविआचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक मतदारांच्या घराघरापर्यंत पोहोचिवणार आहेत. जिल्ह्यातील चालकांनी जाहिर पाठींबा बविआला दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. निवडणूक प्रचार संपल्यावरही रस्त्यावर अप्रत्यक्षिरत्या बविआचे प्रातिनिधीत्व करणाºया रिक्षा प्रवाशांना घेऊन फिरणार असल्यामुळे आता निवडणूक आयोग आचारसंहितेचा भंग झाला म्हणून ओरड करणार का असे कार्यकर्ते मिस्कीलपणे बोलताना दिसत आहेत. बविआचा हा आशवाद प्रत्यक्षात कितपत खरा ठरेल, हे मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. त्याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.>शब्दाला महत्व असलेली साहेबांची शिवसेना राहिली नाहीरात्री साडे बारापर्यंत चिन्हाचं वाटप होऊ दिलं नाही. केवळ मंत्र्याच्या दबावावर काम करणाºयां निवडणूक यंत्रणेसह मंत्र्याना सुप्रीम कोर्टात खेचणार आहे, असा इशारा हितेंद्र ठाकूर यांनी दिला. आता साहेबांची शिवसेना राहिली नाही, साहेबांच्या शिवसेनेचा एक दरारा होता, शब्दाला महत्व होतं, पण आता तसे राहिले नाही. केवळ दाढी वाढवून धर्मवीर होता येत नाही, असा टोला त्यांनी लगावला.>कार्यकर्ते हीच बविआची ताकदकार्यकर्ते हिच बहुजन विकास आघाडीची ताकद आहे.निवडणूक चिन्ह कोणते मिळणार याची चिंता नसली तरी, कुटनीतीच्या राजकारणामुळे बविआचा प्रत्येक कार्यकर्ता आता डिवचला गेला आहे. रिक्षा निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर स्वत: सोमवारपासून दोन दिवस कासार, जव्हार, मोखाडा, विक्रमगड येथे प्रचारासाठी जाणार आहेत.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpalghar-pcपालघरHitendra Thakurहितेंद्र ठाकूर