शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

Sanjay Raut: “हिशोब सगळ्यांनाच द्यावा लागतो, चौकशी तुमचीही होऊ शकते”; संजय राऊतांचा भाजपाला इशारा

By प्रविण मरगळे | Updated: November 14, 2020 12:41 IST

Sanjay Raut Interview with Kunal Kamra News: लोकांना ब्लॉक करणे, ट्रोल करणे हा भाजपाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.

ठळक मुद्देएका पक्षाने देश चालत नाही, ६० वर्षात अनेक पक्ष आले अन् गेले, देश देशच राहतोमोठमोठे नेते देशात आले, आज तुमच्याकडे सत्ता आहे, उद्या आमच्याकडे असेल, हिशोब सगळ्यांनाच द्यावा लागतोसुशांत राजपूत प्रकरणात ठराविक लोकांनाच टार्गेट करायचं हे सांगितलं होतं का?

मुंबई - सुशांत सिंग राजूपतला बिहारचं मानत नाही, तो मुंबईचा आहे, मुंबईत येऊन सुशांतची ओळख निर्माण झाली, सुशांत आमचा मुलगा आहे, त्याच्यासोबत चुकीचं झालं असेल तर आम्ही त्याला न्याय देऊ, किंचाळूच चुकीचं बोलणं खरं होत नाही. जे सत्य असते ते शांतपणेही त्याचं काम सुरु ठेवतं. जे सत्य आहे ते लपवून नवीन काही शोधायचं प्रयत्न सुरू होता असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला.

कुणाल कामरासोबत झालेल्या मुलाखतीत संजय राऊतांनी सुशांत राजपूत प्रकरणावर भाष्य केले. सुशांत राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशी करण्याची तुम्हाला कोणाची ऑर्डर होती का? ठराविक लोकांनाच टार्गेट करायचं हे सांगितलं होतं का? मुंबई पोलिसांनी जो तपास केला तो शतप्रतिशत खरा होता, जगातील सर्वोत्तम पोलिसांमध्ये मुंबई पोलिसांचा समावेश आहे. वर्दीचा सन्मान राखला पाहिजे, मुंबई पोलिसांना माफिया म्हणतात, त्यांच्याच सुरक्षेत फिरता, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलतात, शरद पवारांविरोधात बोलतात, त्या व्यक्तींसोबत पोलिसांनी राहू नये हे आम्ही बोललो नाही. पोलीस त्यांचे काम करतात, त्या व्यक्तीची सुरक्षा करणे हे सरकारचं काम आहे असं राऊत म्हणाले.

“या देशात कोणीही सेक्युलर नाही, सेक्युलरची भाषा करणारे सर्वात जास्त धर्मांध"

त्याचसोबत लोकांना ब्लॉक करणे, ट्रोल करणे हा भाजपाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे, देश खूप मोठा आहे, एका पक्षाने देश चालत नाही, ६० वर्षात अनेक पक्ष आले अन् गेले, देश देशच राहतो, जो नडणारा असतो, बिनधास्त बोलतो त्याचं नाव नेहमी राहतं. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलं नाही, मोठमोठे नेते देशात आले, आज तुमच्याकडे सत्ता आहे, उद्या आमच्याकडे असेल, हिशोब सगळ्यांनाच द्यावा लागतो, चौकशीचा ससेमिरा तुमच्यामागेही लागू शकतो, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.

खासगी आयुष्य वैगेरे काहीच नाही...

खासगी आयुष्य वैगेरे काय नसतं, खूप लहान वयात मी सामनाचं काम सुरु केलं, २८ वर्षाचा असताना माझ्यावर सामना संपादकाची जबाबदारी आली, बाळासाहेब ठाकरेंसारख्या नेत्यासोबत काम करणं हे भाग्य होतं. ही फक्त मुंबईची लढाई नव्हती, तर देशाची लढाई होती, ज्याठिकाणी लोक राहतात त्याठिकाणी स्थानिकांना प्राधान्य हवं ही बाळासाहेबांची भूमिका होती, देशावर संकट येतं तेव्हा सगळेजण एकत्र येतात. परंतु प्रत्येक राज्याची स्वत:ची संस्कृती आणि भाषा आहे. त्यावेळी शिवसेनेची मराठी माणसासाठी चळवळ सुरु केली. कित्येक लोक आंदोलनात मेली, विचारधारेसाठी मरण्यासही तयार आहे. संजय राऊत बॉम्ब आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जवळ कोणी काम केले असेल तर त्यातील मी एक आहे असं संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतBJPभाजपाMumbai policeमुंबई पोलीस