शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Assam Exit Poll 2021: 'चहाच्या मळ्या'त पुन्हा 'कमळ' फुलणार; आसामबाबत सगळ्या एक्झिट पोलचं एक(च)मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 20:17 IST

ईशान्यमध्ये सर्वात मोठं राज्य आसाम विधानसभेच्या एकूण १२६ जागांसाठी तीन टप्प्यात मतदान पार पडले.

ठळक मुद्देएकूण १२६ जागांपैकी भाजपा ९३, एजीपी २९, यूपीपीएल ११ जागांवर निवडणूक लढवत होतीकाँग्रेस ९५, एआययूडीएफ २०, बीपीएफ १२, डावे ७, आंचलिक गण मोर्चा १ आणि आरजेडी १ जागांवर निवडणूक लढवत होती. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण १२६ जागांपैकी भाजपाला ६०, काँग्रेस २६ जागांवर विजयी होती

नवी दिल्ली – देशात कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. २ मे रोजी निकाल जाहीर होणार असले तरी तत्पूर्वी अनेक चॅनेल्सने एक्झिट पोलनुसार निकालांचा अंदाज वर्तवला आहे. आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपाचं कमळ फुलणार असून याठिकाणी भाजपा सरकार बनवू शकतं अशी आकडेवारी आहे. राज्यात भाजपाला ८५ जागा मिळतील असा अंदाज दाखवण्यात आला आहे. तर काँग्रेसला मागच्या वेळच्या तुलनेत काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे.

मतदानाच्या टक्केवारीत कोण किती पुढे?

पक्षमतदानाची टक्केवारी 
भाजपा +४८ टक्के
काँग्रेस४० टक्के 
अन्य १२ टक्के 

 

कोणाला मिळणार किती जागा?

भाजपा आघाडीला राज्यात ७५ ते ८५ जागा मिळण्याचा अंदाज

भाजपा – ६१-६५ जागा

एजीपी – ९-१३ जागा

यूपीपीएल – ५-७ जागा

काँग्रेस आघाडीला राज्यात ४० ते ५० जागा मिळण्याचा अंदाज

काँग्रेस – २४-३० जागा

एआययूडीएफ – १३-१६ जागा

बीपीएफ – ३-४ जागा

तर अन्य १-४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ईशान्यमध्ये सर्वात मोठं राज्य आसाम विधानसभेच्या एकूण १२६ जागांसाठी तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आघाडी आणि काँग्रेस आघाडीत अटीतटीची लढत होती. तर तिसरी आघाडी म्हणून आसाम जातीय परिषद आणि रायजोर दर मैदानात होतं. भाजपाच्या नेतृत्वात आसाम गण परिषद आणि यूनाइटेड पीपल्स पार्टी लिबरल यांचा समावेश आहे. राज्यात एकूण १२६ जागांपैकी भाजपा ९३, एजीपी २९, यूपीपीएल ११ जागांवर निवडणूक लढवत होती तर भाजपा आघाडीत सात जागांवर मैत्रीपूर्ण लढत होती. आज तकनं दाखवलेल्या एक्झिट पोलमध्ये निकालाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

 काँग्रेसच्या आघाडीत ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट, बोडोलैंड पीपल्स फ्रंट, आंचणिक गण मोर्चा, आरजेडी, डावे पक्ष सहभागी होते. काँग्रेस ९५, एआययूडीएफ २०, बीपीएफ १२, डावे ७, आंचलिक गण मोर्चा १ आणि आरजेडी १ जागांवर निवडणूक लढवत होती. १० जागांवर काँग्रेस आघाडीत मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळत होती. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण १२६ जागांपैकी भाजपाला ६०, काँग्रेस २६, ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट १३, आसाम गण परिषद १४, बोडोलँड पीपल्स फ्रंट १२ आणि अपक्षांना एका जागेवर विजय मिळाला होता.

 

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूकexit pollमतदानोत्तर जनमत चाचणीAssembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021