शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

Exit Poll 2021: पश्चिम बंगालमध्ये 'धाकधुक' वाढली; पाहा, पाच राज्यांचे 'एक्झिट पोल' एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 20:49 IST

West Bengal, Assam, Kerala, Tamilnadu Exit Poll 2021: टाइम्स नाऊ सी वोटर सर्व्हेनुसार याठिकाणी भाजपा टीएमसीला कडवी झुंज देत आहे. परंतु एक्झिट पोलनुसार सरकार बनवण्यासाठी भाजपाला वाट पाहावी लागेल.

ठळक मुद्देसी वोटर नुसार पश्चिम बंगालमध्ये टीएमसीला १५२-१६४ जागा मिळतील. तर भाजपाला १०९-१२१ जागा मिळण्याचा अंदाज आहे. केरळमध्ये मागील अनेक निवडणुकीच्या ट्रेंडप्रमाणे दर ५ वर्षांनी सरकार बदलते. पण यंदा डावे डेमोक्रिटिक फ्रंट या ट्रेंडला मात देण्यात यशस्वी होऊ शकतात. CNX एक्झिट पोलप्रमाणे डीएमके आघाडीला १६५ तर सत्ताधारी एआयडीएमके यांना केवळ ६३ जागांवर समाधान मानावं लागेल.

नवी दिल्ली – पश्चिम बंगाल, आसामसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे एक्झिट पोल आले आहेत. या विधानसभा निवडणुकांचे निकाल २ मे रोजी घोषित होतील. टाईम्स नाऊ सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आणि भाजपात अटीतटीची लढत आहे. परंतु ममता बँनर्जी तिसऱ्यांदा सत्तेत परतण्याची भविष्यवाणी केली जात आहे. तर इंडिया टुडे एक्सिस माय इंडिया एक्झिट पोलनुसार आसाममध्ये भाजपा पुन्हा सत्ता स्थापन करेल. 

पश्चिम बंगालमध्ये ममतांचा एल्गार टाइम्स नाऊ सी वोटर सर्व्हेनुसार याठिकाणी भाजपा टीएमसीला कडवी झुंज देत आहे. परंतु एक्झिट पोलनुसार सरकार बनवण्यासाठी भाजपाला वाट पाहावी लागेल. सी वोटर नुसार पश्चिम बंगालमध्ये टीएमसीला १५२-१६४ जागा मिळतील. तर भाजपाला १०९-१२१ जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांना १४-२५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. ५ राज्यांच्या एकूण ८२२ विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुका पार पडल्या आहेत. बंगालमध्ये २ जागांवर उमेदवारांच्या मृत्यूमुळे मतदान बंद पडलं. 

बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपा सरकार – रिपब्लिक सीएनएक्सदरम्यान, रिपब्लिक-सीएनएक्स एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपा सत्तेत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपाला १३८-१४८ जागा मिळण्याचा दावा करण्यात आला आहे. तर टीएमसीला १२६-१३६ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि डाव्या आघाडीला ६-९ जागांवरच समाधान मानावे लागेल तर इतरांना १-३ जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. 

आसाममध्ये भाजपा सत्ता राखणारआसाम विधानसभेच्या एकूण १२६ जागांसाठी मतदान झाले. याठिकाणी बहुमतासाठी ६३ जागांची गरज आहे. इंडिया टुडे एक्सिस माय इंडिया एक्झिट पोलनुसार १२६ जागांच्या आसाममध्ये भाजपा आघाडी पुन्हा सत्तेत येईल. भाजपा आघाडीला ७५-८५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस आघाडीला ४०-५० जागा मिळू शकतात. इतरांच्या खात्यात १-४ जागा जाण्याची शक्यता आहे. 

केरळमध्ये पुन्हा एकदा डावे सरकार?केरळ विधानसभेच्या एकूण १४० जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी ७१ जागांची गरज आहे. रिपब्लिक CNX एक्झिट पोलनुसार याठिकाणी डावे पुन्हा एकदा सरकार बनवण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मागील अनेक निवडणुकीच्या ट्रेंडप्रमाणे दर ५ वर्षांनी सरकार बदलते. पण यंदा डावे डेमोक्रिटिक फ्रंट या ट्रेंडला मात देण्यात यशस्वी होऊ शकतात. त्यांना ७५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस आघाडीला ६१ जागांवर विजय मिळू शकतो. भाजपाला केरळमध्ये अवघ्या ३ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

तामिळनाडूमध्ये स्टालिन सरकार?तामिळनाडू विधानसभेत एकूण २३४ जागा आहेत त्यात बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ११८ जागांची आवश्यकता आहे. रिपब्लिक CNX एक्झिट पोलनुसार तामिळनाडूत यंदा सत्ता परिवर्तन होऊ शकते. डिएमकेला जबरदस्त यश मिळताना दिसत आहे. CNX एक्झिट पोलप्रमाणे डीएमके आघाडीला १६५ तर सत्ताधारी एआयडीएमके यांना केवळ ६३ जागांवर समाधान मानावं लागेल. तर इतरांना ६ जागा मिळू शकतात.

टॅग्स :exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१Tamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जीAssembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021