शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर; पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा यांना लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 04:06 IST

खा. सोनिया गांधी यांनी अडचणीच्या काळात पक्षाला उभारी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युपीए-१ आणि युपीए-२ च्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात सर्वसामान्यांना न्याय देणारे, देशाला विकासाची नवी दिशा देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय झाले.

मुंबई : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून दिल्लीत वादंग सुरू झाला असताना प्रदेश काँग्रेस नेत्यांमधील मतभेद उघड झाले आहेत. राहुल गांधी यांनीच अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा यांना मुंबईत महाराष्ट्रात फिरणे मुश्कील करू, असा, इशारा पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी दिला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांच्या ‘त्या’ पत्रावर स्वाक्षऱ्या असल्यामुळे राहुल गांधी यांच्याशी निष्ठा दाखवण्याची चालून आलेली संधी अनेकांनी सोडली नाही. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी गांधी घराण्यावर आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे अत्यंत निंदाजनक आहे. तीनही नेत्यांनी ताबडतोब माफी मागावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात करणे मुश्किल करू, असा इशारा दिला. तर भारताची एकता, अखंडता तसेच प्रगतीमध्ये नेहरू-गांधी कुटुंबाने दिलेले योगदान अपूर्व आहे. देश व काँग्रेस पक्ष संघटित ठेवण्यासाठी पुढील काळातही त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे. पक्षाला बांधून ठेवण्याची क्षमता केवळ गांधी कुटुंबाकडे आहे. इतिहासात हे अनेकदा सिद्ध झाले आहे. या वास्तवाची जाणिव ठेवूनच खा. राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

खा. सोनिया गांधी यांनी अडचणीच्या काळात पक्षाला उभारी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युपीए-१ आणि युपीए-२ च्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात सर्वसामान्यांना न्याय देणारे, देशाला विकासाची नवी दिशा देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय झाले. कोणतीही महत्वाकांक्षा न बाळगता कर्तव्यभावनेतून त्यांनी देश व काँग्रेसची सेवा केली. त्यामुळे पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत त्या योग्य व सर्वमान्य निर्णय घेतील, याचा पूर्ण विश्वास आहे असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले....तर सरकारमधून बाहेर पडू - वडेट्टीवारकाँग्रेस पक्ष हा लोकशाही मूल्यांचं प्रतीक आहे. म्हणूनच जे पत्र सोनिया गांधींना लिहिलं आहे, त्याकडे सध्याच्या नेतृत्वाला विरोध म्हणून पाहिले जाऊ नये. राहुल गांधींनी आम्हाला सरकारमधून बाहेर पडण्यास सांगितले, तर आम्ही तत्काळ बाहेर पडू. एक दिवसही सरकारमध्ये राहणार नाही, असे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण