शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पाकला दम दिला म्हणून अभिनंदनला सोडले; नरेंद्र मोदी यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 04:07 IST

'योग्य वेळी सर्व काही उघड करीन'

पाटण (गुजरात) : आपण पाकिस्तानला गंभीर परिणाम होतील असा दम दिला म्हणून बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या हाती लागलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान या भारतीय हवाईदलाच्या वैमानिकास त्या देशाने लगेच सहीसलामत सोडले असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केला.बालाकोट हवाई हल्यानंतर भारत व पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये धुमश्चक्री झाली होती. त्यावेळी अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे एक एफ-१६ विमान पाडले होते. परंतु त्यांच्याही विमानावर हल्ला झाल्याने त्यांनी पॅराशूटने बाहेर उडी घेतली. पण ते पाकिस्तानच्या हद्दीत उतरले. दोन दिवसांनी पाकिस्तानने त्यांना सोडून दिले होते.येथील प्रचारसभेत त्या घटक्रमाचा संदर्भ देत मोदी म्हणाले, आम्ही पत्रकार परिषद घेतली व आमच्या वैमानिकाचे काही बरेवाईट झाले तर, मोदींनी पाहा आमची काय अवस्था केली, असे जगाला सांगत फिरण्याची तुमच्यावर वेळ येईल, असा सज्जड इशारा आम्ही पाकिस्तानला दिला. मोदी पुढे म्हणाले की, मोदींनी १२ क्षेपणास्त्रे तयार ठेवली आहेत व ते कदाचित हल्ला करतील व परिस्थिती आणखी चिघळेल, असे एका अमेरिकी अधिकाऱ्याने दुसºया दिवशी म्हटले होते. त्याच दिवशी पाकिस्तानने आमच्या वैमानिकाची सुटका करण्याचे जाहीर केले, अन्यथा त्यावेळी ‘कत्ल की रात’ झाली असती.हे सर्व अमेरिकेचे म्हणणे होते. मला आत्ता त्याविषयी काहीही बोलायचे नाही. योग्य वेळ येईल तेव्हा मी सर्व बोलेन, असेही मोदी म्हणाले.राष्ट्रीय सुरक्षेशी आम्ही कधीही तडजोड केली नाही व करणारही नाही, असे सांगत पंतप्रधान असेही म्हणाले की, पंतप्रधानपदाची खुर्ची राहो अथवा जावो, पण एक तर मी तरी जिवंत राहीन किंवा दहशतवादी तरी जिवंत राहतील, हा माझा ठाम निर्धार आहे.गुजरातमधील २६ जागांवर मंगळवारी मतदान व्हायचे आहे. गुजरात हे माझे राज्य असल्याने येथील भूमीपुत्राला सर्व जागा मिळवून देणे हे गुजरातच्या मतदारांचे कर्तव्य आहे, असे सांगत मोदी म्हणाले की, माझे सरकार पुन्हा सत्तेवर येणार हे नक्की. पण गुजरातने भाजपला २६ जागा दिल्या नाहीत तर निकालानंतर लगेच टीव्ही वाहिन्यांवर त्याची चर्चा रंगेल. (वृत्तसंस्था)शरद पवारांना चिमटापूर्वी ज्यांना मोदींनी आपले राजकीय गुरू म्हटले, त्या शरद पवारांनी ‘मोदी यापुढे काय करतील याची मला भीती वाटते,’ असे वक्तव्य शनिवारी केले होते. त्यावर पवारांना चिमटा घेत मोदी म्हणाले की, उद्या मोदी काय करणार याची जर पवारांनाही कल्पना नसेल, तर इम्रान खानला तरी ते कसे कळणार?

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGujarat Lok Sabha Election 2019गुजरात लोकसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानPakistanपाकिस्तान