शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

"काँग्रेसमधील ग्रुप २३ चे नेते नरमले, सर्वांनी एकजूट होऊन पक्ष मजबूत करायला हवा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2020 07:19 IST

ग्रुप२३ मधील आक्रमक नेते गुलाम नबी आझाद यांनी काल झालेल्या काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत सर्वांनी एकत्र येऊन ऐक्य टिकविणे हीच अहमद पटेल यांना खरी श्रंद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन केले

 शीलेश शर्मा

नवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यपद्धतीवरून आक्रमक झालेले २३ काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या मृत्यूनंतर नरमले असल्याचे संकेत मिळत आहेत. या नेत्यांना ‘ग्रुप२३’ या नावाने ओळखण्यात येऊ लागले होते.

ग्रुप२३ मधील आक्रमक नेते गुलाम नबी आझाद यांनी काल झालेल्या काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत सर्वांनी एकत्र येऊन ऐक्य टिकविणे हीच अहमद पटेल यांना खरी श्रंद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन केले. पक्ष सध्या गंभीर संकटात आहे. मोदींचा मुकाबला करण्यासाठी आपणास ऐक्य टिकवायला हवे. अन्यथा भाजपा लाभ उठवेल, असे आझाद म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.

ग्रुप२३ मधील एका वरिष्ठ नेत्याने लोकमतला सांगितले की, अहमद पटेल हे आजपर्यंत पक्ष नेतृत्व आणि आमच्यातील दुवा म्हणून काम करीत होते. ते आमच्या मताशी सहमत असून पक्ष नेतृत्वास समजावतील, असे आम्हाला वाटत होते. त्यांच्या मृत्यूमुळे मध्यस्थी करणारा कोणी नेताच आता उरलेला नाही.

या नेत्याने सांगितले की, आम्ही केवळ २३ जण नसून आमच्या सोबत नेत्यांची लांबच लांब रांग आहे. आमच्यातील कोणीही पक्ष फोडणार नाही, अथवा सोडूनही जाणार नाही. आमचे सारे आयुष्य काँग्रेससोबत गेले आहे. अहमद पटेल यांच्या जाण्याने नेतृत्व आणि आमच्यातील कडी तुटली आहे. अशा वेळी सर्वांनी एकजूट होऊन काँग्रेसला मजबूत करायला हवे. सोनिया गांधी यांनी सर्व चर्चित नावांना बाजूला सारून माजी रेल्वेमंत्री पवन बन्सल यांची कार्यकारी कोषाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे अहमद पटेल यांच्या जबाबदाऱ्या तात्काळ प्रभावाने देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसAhmed Patelअहमद पटेलSonia Gandhiसोनिया गांधी