शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

"मी एक चांगला सहकारी आणि मित्र गमावला, काँग्रेस पक्ष सातव कुटुंबीयांच्या पाठीशी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 22:35 IST

rahul gandhi : राजीव आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या परिवाराच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सदैव भक्कपणे उभे राहील, अशा शोकभावना खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत.

ठळक मुद्देमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने स्व. खासदार राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑनलाईन श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते, यावेळी राहुल गांधी बोलत होते.

मुंबई : राजीव सातव यांचे निधन झाले यावर आजही विश्वास बसत नाही, त्यांच्या निधनाने सातव परिवारावर जेवढा मोठा आघात झाला आहे तेवढाच आघात काँग्रेस पक्षावरही झाला आहे. राजीव यांची दोन कुटुंबं होती एक त्यांची आई, पत्नी व मुले आणि दुसरे काँग्रेस पक्ष. राजीवमध्ये एक चमक आहे हे पहिल्याच भेटीत दिसले होते, त्यांनी नेहमी पक्षासाठी उत्तम काम केले. राजकारणात त्यांनी विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पडली. राजीव कधीच कोणाबद्दलही वाईट बोलत नसे. लोकसभेत काँग्रेस पक्षाते ४५ सदस्य असताना ते ५-७ व्यक्तीचे काम एकटेच करत असत. राजीव यांच्या निधनाने मी एक चांगला सहकारी व मित्र गमावला आहे. राजीव आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या परिवाराच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सदैव भक्कपणे उभे राहील, अशा शोकभावना खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत. (online tribute meeting to pay homage to rajiv satav, rahul gandhi and other senior congress leaders present)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने स्व. खासदार राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑनलाईन श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते, यावेळी राहुल गांधी बोलत होते. तसेच, आपल्या भावना व्यक्त करताना राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या की, राजीव यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे यावर विश्वास बसत नाही. अत्यंत शांत स्वभावाचा, पक्षाशी निष्ठा असणारा, कामाच्या जोरावर पक्षावर विविध भूषवणारे, पक्ष कार्याला प्रथम महत्व देणारे राजीव यांचे एवढ्या कमी वयात निधन होईल असे वाटले नव्हते. ते एक लढवय्या नेता होते. पण कोरोनाविरुद्धची लढाई ते हरले. राजीव यांच्या निधनाने आमच्या परिवारातील एक सदस्य गेल्याचे दुःख आहे. सातव कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना.

मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, कोरोनाने आमचा एक युवा साथीदार आम्हाला सोडून गेला हे मनाला पटत नाही. पक्षासाठी सदैव तत्पर असणारा, पक्षनेतृत्वाचा विश्वास, काम करण्याची क्षमता असलेला, काँग्रेस पक्षातील पुढच्या पिढीतील भवितव्य होते. ते वंचितांचा आवाज, तरुणांचे प्रेरणास्रोत होते. कमी वयातच त्यांनी कारकिर्दिला सुरुवात करुन आपल्या कामाच्या बळावर राष्ट्रीय पातळीवर पोहचले. संसदेत ते सामान्य जनतेसाठी आवाज उठवत असत. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर त्यांची श्रद्धा होती.

याचबरोबर, राजीव सातव यांच्या अकाली निधनाने मोठा धक्का बसला. राजीव लहान असल्यापासून आपण त्यांना ओळखत होतो. त्यांच्या कुटुंबियांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाने सातव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यांच्या निधनाने पक्षाचा तसेच कुटुंबाचा मोठा आधार गेला आहे, असे गुलाम नबी आझाद म्हणाले. तर एच. के. पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील एक उमदे नेतृत्व ज्यांनी महाराष्ट्रासह राष्ट्रीय पातळीवर उत्तम काम केले. पक्षाने त्यांना दिलेली जबाबदारी उत्तमरितीने पार पाडली. देशासाठी आणि पक्षासाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केले. काँग्रेस विचारांशी त्यांची बांधीलकी होती. जनसामान्यांमध्ये ते लोकप्रिय नेते होते. त्यांच्या निधानाने माझे वैयक्तिक व पक्षाची मोठी हानी झाली आहे. राजीव हे त्यांच्या कामाच्या माध्यमातून सदैव स्मरणात राहतील.

'राजीव यांनी ग्रामीण भागातून राजकीय कारकीर्दीला सुरुवात करुन देशपातळीवर आपल्या कामाचा वेगळी छाप पाडली होती. संसदेत काँग्रेस पक्षाची रणनिती ठरवण्यातही ते नेहमी आग्रही असत. गुजरातचे प्रभारी म्हणून त्यांनी पक्षाला मोठी ताकद मिळवून दिली. काँग्रेस पक्षाची गुजरातमध्ये वाढलेली ताकद ही राजीव सातव यांच्या कामाचा परिपाक आहे. कोरोनाने राजीव सातव यांना आपल्यातून हिरावले ही अत्यंत दुःखद घटना आहे', असे के, सी. वेणुगोपाल म्हणाले. तर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राजीव सातव हे उमदे नेतृत्व तसेच पक्षाचे भविष्य होते. कोरोनाने त्यांना अकाली हिरावून घेतले. शेतकरी, कामगारांसाठी लढणारा नेता अशी त्यांची ओळख होती.लोकसभेत त्यांच्याबरोबर काम केले. राजीव यांच्या निधनाने पक्षाची व वैयक्तिक मोठी हानी झाली आहे.

या ऑनलाईन श्रद्धांजली सभेत खा. राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी, विरोधी पक्षनेता राज्यसभा मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सरचिटणीस गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील चाकूरकर. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सरचिटणीस मुकुल वासनिक, के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील,  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्ष नेता तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मत्ससंवर्धन मंत्री अस्लम शेख, दूग्धविकास मंत्री सुनिल केदार, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, उपाध्यक्ष मोहन जोशी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, आ. अभिजित वंजारी तसेच काँग्रेसचे खासदार, आमदार आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRajeev Satavराजीव सातवcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीNana Patoleनाना पटोले