शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

CAA चे नियम-कायदे बनवण्यासाठी अजून सहा महिन्यांचा वेळ लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 15:56 IST

Citizenship Amendment Act: या कायद्यांतर्गत पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानातील पीडित हिंदू, पारशी, शीख, ख्रिश्चन, जैन आणि बौद्ध समाजातील लोकांना भारताचे नागरिकत्व देण्यात येईल.

ठळक मुद्दे10 जानेवारी 2020 पासून सीएए लागू करण्यात आला आहे, पण अद्याप याचे नियम आखण्यात आलेले नाहीत.

नवी दिल्ली: गृह मंत्रालयाने नागरिकक्त सुधारणा कायदा (Citizenship Amendment Act) चे नियम बनवण्यासाठी अजून 6 महीन्यांचा वेळ मागितला आहे. मंत्रालयाने मंगळवारी राज्यसभा आणि लोकसभांच्या समित्यांना 9 जानेवारी 2022 पर्यंतचा वेळ मागितलाय. सीएए कायद्यांतर्गत पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानातील अल्पसंख्यक हिंदू, पारशी, शीख, ख्रिश्चन, जैन आणि बौद्ध समाजातील लोकांना भारताचे नागरिकत्व दिले जाते.

काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी संसदेत सीएएच्या नियमांना अधिसूचित करण्याच्या तारखेसंबंधी प्रश्न विचारला. त्यावर गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, सीएए कायदा 10 जानेवारी 2020 पासून लागू झाला आहे. तसेच, नागरिकत्व सुधारणा कायदा, 2019 च्या नियमांना ठरवण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेच्या समित्यांना 09.01.2022 पर्यंतची वेळ मागितली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 12 डिसेंबर 2019 ला या कायद्यावर सहमती दर्शवली होती. सीएए समोर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात याचा विरोध झाला होता. देशातील अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी या कायद्याचा जोरदार विरोध केला होता. यादरम्यान, अनेक ठिकाणी हिंसाचारही घडला होता.

काय आहे सीएए कायदा ?तीन देशातील धार्मिक अत्याचारामुळे 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात येणारे हिंदू, पारशी, शीख, ख्रिश्चन, जैन आणि बौद्ध समाजातील नागरिकांना अवैध प्रवासी मानले जाणार नाही. तसेच, त्यांना भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी काहीच अडचण येणार नाही.

टॅग्स :Amit Shahअमित शहाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपाcongressकाँग्रेस