शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

मोठा गौप्यस्फोट! "...तेव्हा ममतांनी प्रवाशांच्या बदल्यात दहशतवाद्यांकडे ओलीस राहण्याची केली होती तयारी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 16:15 IST

Kandahar plane hijack : २४ डिसेंबर १९९९ मध्ये नेपाळची राजधानी काठमांडू येथून दिल्लीकडे निघालेल्या इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अपहरण केले होते.

नवी  दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांना सातत्याने विरोध करणारे भाजपाचे माजी नेते यशवंत सिन्हा  (Yashwant sinha) यांनी आज तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  दरम्यान, तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर यशवंत सिन्हा यांनी १९९९ मध्ये वाजपेयी सरकारच्या काळात झालेले कंधार विमान अपहरणकांड (Kandahar plane hijack ) आणि  ममता बॅनर्जींच्या (Mamata banerjee ) त्यावेळच्या भूमिकेबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.  (At the time of the Kandahar plane hijack, Mamata banerjee was offered to become a hostage, Yashwant sinha claims)

डिसेंबर १९९९मध्ये झालेल्या कंधार विमान अपहरणकांडावेळी ममता बॅनर्जींनी अपहृत प्रवाशांच्या बदल्यात दहशतवाद्यांकडे स्वत: ओलीस म्हणून राहण्याची तयारी दर्शवली होती, असा दावा यशवंत सिन्हा यांनी केला आहे. याबाबत यशवंत सिन्हा म्हणाले की,  आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की, डिसेंबर १९९९ मध्ये जेव्हा इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण झाले होते. तेव्हा दहशतवाद्यांनी हे विमान अफगाणिस्तानमधील कंधार येथे नेले होते.  त्या आणीबाणीच्या परिस्थितीत कॅबिनेटमध्ये चर्चा सुरू झाली होती. तेव्हा ममता बॅनर्जींनी स्वत: ओलीस म्हणून दहशतवाद्यांकडे जाण्याची तयारी दर्शवली होती. मात्र दहशतवाद्यांनी इतर अपहृत प्रवाशांना दहशतवाद्यांनी सोडावे, अशी दहशतवाद्यांना अट घालण्यात यावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. देशासाठी जे काही बलिदान द्यावे लागेल ते देण्याची तयारी त्यांनी केली होती, असे यशवंत सिन्हा यांनी सांगितले.

 २४ डिसेंबर १९९९ मध्ये नेपाळची राजधानी काठमांडू येथून दिल्लीकडे निघालेल्या इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. त्यानंतर हे विमान अमृतसर, लाहोर, दुबई असे फिरवत अखेरीस अफगाणिस्तानला नेले होते.  विमानातील १७६ प्रवाशांपैकी २७ प्रवाशांना दुबईत उतरवण्यात आले होते. तर एका प्रवाशाची हत्या करण्यात आली. अखेरीस ओलीस ठेवलेल्या प्रवाशांच्या बदल्यात मसूद अझहर, अहमद उमर सईद शेख आणि मुश्ताक अहमद जर्गर या दहशतवाद्यांना सोडण्याची नामुष्की भारत सरकारवर ओढवली होती.   

दरम्यान, यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांचे पुत्र जयंत सिन्हा हे मात्र भाजपामध्येच आहेत. यशवंत सिन्हा यांनी २०१८ मध्ये भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. पण जयंत सिन्हा भाजपातच राहिले. जयंत सिन्हा हे सध्या झारखंडमधील हजारीबाग येथून भाजपाचे लोकसभा सदस्य आहेत.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीYashwant Sinhaयशवंत सिन्हाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेस