शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

कोकणच्या मातीचे ऋण विकासाच्या रूपाने फेडायचे आहे - सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 06:41 IST

रायगड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी कर्तृत्ववान खासदारांची गरज आहे.

श्रीवर्धन : रायगड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी कर्तृत्ववान खासदारांची गरज आहे. केंद्रातील निधीचा वापर कसा करावा, याची जाण विद्यमान खासदारांना नाही. मला कोकणच्या मातीचे ऋण विकासाच्या रूपाने फेडायचे आहेत. श्रीवर्धनचा आमदार या नात्याने विकासकामे करण्याचे भाग्य मला लाभले. आता खासदार म्हणून काम करण्याची संधी द्या. रायगड जिल्ह्याचे पर्यटन जगाच्या नकाशावर दिसेल, असे वक्तव्य आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी के ले.श्रीवर्धन राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयोजित प्रचारसभेत ते बालत होते. श्रीवर्धनमधील कसबापेठेतील चौकसभेत त्यांनी उपस्थित कार्यकर्ते व मतदार यांना संबोधित केले. जनतेचा प्रतिनिधी या नात्याने मला विकासाची गंगा दिल्लीवरून रायगडपर्यंत आणायची आहे. आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची विकासकामे मी श्रीवर्धनचा आमदार या नात्याने केली आहेत. श्रीवर्धनचा कायापालट करण्याचे भाग्य मला लाभले आहे. भविष्यात विविध समाजोपयोगी विकासकामांना मी चालना देणार आहे. गेली पाच वर्षे सत्तेत नसतानासुद्धा विकास निधींची कमतरता मी कधीच भासू दिली नाही. आज रायगड जिल्ह्यातील जनता विकासाच्या पाठीशी उभी आहे, याचा मला विश्वास आहे. बॅरिस्टर अंतुले हे माझे मार्गदर्शक होते. त्यांनी कोकणाच्या विकासाला चालना दिली. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मी अर्थमंत्री असताना सर्वात मोठे पॅकेज कोकणाच्या जनतेसाठी दिले. त्या वेळी विरोधातील पक्षाने हा कोकणचा अर्थसंकल्प आहे असे बोलत माझ्यावर टीका केली. मला कोकणच्या मातीचे ऋण विकासरूपी कर्तुत्वाने फेडायचे आहे, असे तटकरे यांनी सांगितले.

अनंत गीते यांच्या प्रचारसभेतील त्यांच्या भाषाशैलीची संभावना करताना तटकरे यांनी सांगितले, मला यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांचा वैचारिक वारसा लाभला आहे ते संस्कार आमच्यावर आहेत. त्यामुळे माझी सापाशी केलेली तुलना ही असंस्कृतपणाचे द्योतक आहे. या वर्षीची लढाई ही निष्क्रियतेविरुद्ध विकास अशी करायची आहे. अनंत गीते रायगडच्या जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यात अपयशी झाले आहेत. त्यांच्या निष्क्रियतेमुळे जनता कंटाळली आहे.
राजकारणात वारसदार हा रक्ताने नव्हे तर विचारांच्या अथांगतेतून कर्तृत्व सिद्धीद्वारे ठरवला जातो, असे तटकरे यांनी अप्रत्यक्षपणे नावीद अंतुले यांच्या शिवसेना प्रवेशासंदर्भात भाष्य केले. तालुक्यातील मुस्लीम समाज माझ्या पाठीशी उभा आहे. मी धर्मनिरपेक्ष विचारांचा पाईक आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदाने राहावे. आपला विकास साधावा, विकासातून प्रगतीची दारे सर्वांसाठी खुली व्हावीत त्यासाठी मला खासदार म्हणून संधी द्या. आगामी काळात जिल्ह्याचा चेहरामोहोरा विकासकामाद्वारे बदलण्याची जबाबदारी माझी आहे, असे तटकरे म्हणाले. यावेळी जितेंद्र सातनाक, नरेंद्र भुसाने आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगड