शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

लिंगायत: राजीव गांधी, अडवाणींसारखी चूक परवडणार नाही; येडीयुराप्पांबाबत भाजपा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 16:29 IST

Karnataka Politics: कर्नाटक ही अशी भूमी आहे जिने देशाच्या राजकीय इतिहासात दिल्लीलाही मोठी मदत पुरविली आहे. इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांना देखील कर्नाटकातून निवडणूक लढवावी लागली आहे.

बंगळुरु: कर्नाटक (Karnataka) ही अशी भूमी आहे जिने देशाच्या राजकीय इतिहासात दिल्लीलाही मोठी मदत पुरविली आहे. इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांना देखील कर्नाटकातून निवडणूक लढवावी लागली आहे. अशा या कर्नाटकात सध्या लिंगायत असा मुद्दा बनला आहे, जो भाजपाला देखील नामोहरम करु शकतो. यामुळे कर्नाटकातील मुख्यमंत्री बदलाचे वारे असले तरी देखील भाजपाच्या वरिष्ठांना तिथे ताकही फुंकून प्यावे लागत आहे. सध्या मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा (BS yediyurappa) त्या समाजाचे निर्विवाद वर्चस्व असलेले नेते आहेत. (BJP want to take resigne of BS yediyurappa, but histry told lesson to Rajiv Gandhi and LK Advani.)

येडीयुराप्पा फक्त लिंगायतच नाहीत तर अल्पसंख्यांक आणि अन्य समाजाच्या नेत्यांशी देखील चांगले संबंध ठेवलेले नेते आहेत. यामुळे त्यांना त्रास देणे सोपी गोष्ट नाहीय. देशाच्या स्वातंत्र्याआधीही लिंगायत समाजच तिथे प्रबळ होता. 1956 पासून 1969 मध्ये इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेसचे विभाजन होईस्तोवर तिथे लिंगायतच मुख्यमंत्री होता. 

राजीव गांधींकडून काय चूक झालेली....इंदिरा गांधी यांच्यानंतर काँग्रेसचे नेते आणि पंतप्रधान राजीव गांधींनी एक मोठी चूक केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री विरेंद्र पाटील यांना नवी दिल्लीला रवाना होण्याआधीी विमानताळावरून बाहेर काढण्याचे आदेश दिले होते. यानंतर लिंगायत समाजाची मते भाजपाकडे वळली. या घटनेच्या एक वर्ष आधी पाटील यांनी काँग्रेसला 224 पैकी 184 जागांवर विजय मिळवून दिला होता. या नंतर भलेही काँग्रेस दोनदा सत्तेत आली परंतू महत् प्रयास करूनही लिंगायतांना आपल्या बाजुला आणण्यास काँग्रेस असफल ठरली होती. 

2011 मध्ये भाजपाने ती चूक केली होती. येडीयुराप्पांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास एल के अडवाणी यांनी सांगितले होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. मात्र, येडीयुराप्पांनी थेट पक्षच सोडत नवा पक्ष स्थापन केला होता. यानंतर आलेल्या 2013 च्या निवडणुकीत भाजपाला सत्ता गमवावी लागली होती. येडीयुराप्पा यांनी 10 टक्के मते खाल्ली होती आणि सहा आमदार निवडूण आणले होते. आता भाजपाला ते पुन्हा करायचे नाहीय. भाजपाने यासाठी येडीयुराप्पांचे वय कारण ठेवले आहे. येडीयुराप्पा 78 वर्षांचे आहेत. त्यांना चांगल्या प्रकारे निरोप न दिल्यास लिंगायत समाज दुरावण्याची भीती दिल्लीतील नेत्यांना वाटत आहे. यामुळे येडीयुराप्पा भाजपासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे, असे राजकीय धुरिणांनी सांगितले आहे. 

येडीयुराप्पांच्या तीन अटी...यासाठी लिंगायत समाजाच्याच नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यासाठी येडींनी दिल्लीच्या नेत्यांसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. खासदार असलेला मोठा मुलगा बी.एस राघवेंद्रला केंद्रात मंत्रिपद, दुसरा मुलगा बी.एस. विजेंद्र याला राज्यात मंत्रिपद आणि मुख्यमंत्री मी सांगेन तोच, अशा या अटी आहेत. 

चार नावे चर्चेत... (Who is next CM of Karnataka)यामुळे सध्या चार नावांची चर्चा आहे. 2023 मध्ये निवडणुका होणार आहेत. खाण मंत्री मुरगेश निरानी, गृह मंत्री बसवराज बोमाई, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि चौथे बसवंगौड़ा पाटील यतनाल यांची नावे चर्चेत आहेत. यतनाल यांनीच येडीयुराप्पांना हटविण्याची मागणी केली होती. आता भाजपा नेतृत्व येडीयुराप्पांचे लाड पुरविते की यतनाल यांना मुख्यमंत्री करते हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :B. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पाKarnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसRajiv Gandhiराजीव गांधी