शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

Lok Sabha Election 2019: तिकिटांच्या वाटपावरून युती, आघाडीत धुसफुस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 06:15 IST

विखे-पवार वाक्युद्धाने तणाव; दानवे-खोतकरांचा वाद कायम

- अतुल कुलकर्णी/ यदु जोशी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांनी देव पाण्यात ठेवलेले असतानाच काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी व भाजपा-शिवसेना युतीत अंतर्गत धुसफुस सुरू आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेने आघाडीत तणाव निर्माण झाला आहे, तर जालन्यात रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यातील वाद अजून मिटलेला नाही.अहमदनगरच्या जागेवरून आधीच काँग्रेस-राष्टÑवादीत रस्सीखेच झाली असताना विखेंच्या टीकेने या वादात ठिणगी पडली. शरद पवार यांनी मात्र विखेंचे म्हणणे फार गांभीर्याने घेऊ नका, असे सांगितले असले तरी राष्टÑवादीचे नेते दुखावले गेले आहेत. काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीतही या वादाचे पडसाद उमटले. विखेंनी ऐन निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेमुळे एका गटाने नाराजी व्यक्त केली. बाळासाहेब थोरात यांनी विखेंच्या विरोधात भूमिका घेतली, तर माणिकराव ठाकरे यांनी विखेंची पाठराखण केली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विखे-थोरात यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना यश आले नाही. विरोधी पक्षनेतेपदाबाबत पक्षश्रेष्ठीच योग्य तो निर्णय घेतील असे सांगून त्यांनी स्वत:ची सुटका करुन घेतली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही झाल्या प्रकाराबद्दल बैठकीत खेद व्यक्त केल्याचे समजते.माढा मतदारसंघाचा घोळ कायममाढा मतदारसंघात भाजपा आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष उमेदवारांवरुन गोंधळात पडले असल्याचे चित्र आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे आणि रणजितसिंह मोहिते पाटील अशी तीन नावे भाजपाकडून चर्चेत आहेत. मोहिते यांच्या नावाचा दोन्हीकडे विचार सुरू आहे. देशमुख यांचे नाव शेवटी पक्के होईल, असे अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.विजयसिंह मोहिते किंवा रणजितसिंह यांच्यापैकी एकाला संधी देण्याचा राष्ट्रवादीचा विचार आहे. मोहितेंना लढवायचे नसेल तर थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना शब्द वापरायला सांगून संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी द्यावी, असा प्रयत्न आहे. शिंदे हे करमाळामधून विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत. दोन्हीकडे माढाचा तिढा सुटण्याऐवजी वाढला आहे.बारामतीमध्ये भाजपाही उमेदवार ठरवू शकलेली नाही. पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर लढावे, असा भाजपाचा आग्रह आहे. पुण्यात गोंधळाची परिस्थिती आहे. भाजपाकडून पालकमंत्री गिरीश बापट यांचे नाव मागे पडले असताना विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे म्हटले जात होते. तेथे राज्यसभा सदस्य संजय काकडे यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष आहे. ते भाजपासोबत राहावे यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. काकडे काँग्रेसमध्ये जाणार असे त्यांनी जाहीर केले असले तरी काँग्रेसने तशी काहीही घोषणा केलेली नाही.युती । वादाचे दोन मतदारसंघमुंबईत उत्तर-पूर्व : भाजपाचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना पुन्हा संधी दिली तर त्यांचा प्रचार करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली आहे. त्यामुळे सोमय्या यांची उमेदवारी अंतिम करण्यात भाजपाला अडचणी येत आहेत.जालना : सेनेचे खोतकर काँग्रेसकडून?भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात दिलजमाई झाल्याचे वृत्त असतानाच या मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज खोतकर यांची भेट घेतल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले. दोन दिवसांत तुम्हाला गुड न्यूज मिळेल या सत्तार यांच्या वाक्याचा अर्थ खोतकर काँग्रेसकडून निवडणूक लढणार, असा घेतला जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस