शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अमित शहांच्या गुंडांनीच घडवला रोड शोमध्ये हिंसाचार; तृणमूलचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 16:10 IST

तृणमूल काँग्रेसचे भाजपावर गंभीर आरोप

कोलकाता: भाजपाच्या रोड शोमध्ये तृणमूलच्या गुंडांनी हिंसाचार घडवल्याचा आरोप करणाऱ्या भाजपा अध्यक्ष अमित शहांना तृणमूल काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलं आहे. कोलकात्यात हिंसाचार घडवण्यासाठी अमित शहांनीच बाहेरुन गुंड आणले होते, असा पलटवार तृणमूलनं केला. अमित शहांच्या पत्रकार परिषदेनंतर तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी पत्रकारांना संबोधित करत भाजपावर गंभीर आरोप केले. 

कोलकाता विद्यापीठातल्या ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची भाजपाच्या कार्यकर्त्यांनीच तोडफोड केली, असा दावा ओब्रायन यांनी केला. रोड शोमध्ये झालेल्या हिंसाचारात भाजपाचा हात असल्याचे पुरावे आपल्याकडे असून ते लवकरच निवडणूक आयोगाकडे सादर करण्याचं त्यांनी सांगितलं. अमित शहांनी कोलकात्यात हिंसाचार घडवण्यासाठी बाहेरुन गुंड आणले. त्याचे व्हिडीओ आमच्याकडे आहेत, असा दावा करत ओब्रायन यांनी काही व्हिडीओदेखील पत्रकारांना दाखवले. बंगालची अस्मिता असलेल्या विद्यासागर यांचा पुतळा भाजपाच्या गुंडांनी तोडला. विद्यासागर यांचं महात्म्य तुम्हाला विकीपिडियावरुन समजणार नाही, अशी टीका ओब्रायन यांनी केली. कोलकात्यात रोड शो करण्यासाठी बाहेरुन माणसं आणायची गरज काय, असा सवाल ओब्रायन यांनी उपस्थित केला. 'रोड शोमध्ये कोणीही सहभागी होऊ शकतं. पण तेजिंदर बग्गा कोण आहेत. त्यांना एकदा अटक झाली होती. दिल्लीत त्यांनी एका व्यक्तीच्या श्रीमुखात भडकावली होती. शहा अशा गुडांना कोलकात्यात घेऊन गेले होते,' अशा शब्दांत ओब्रायन यांनी शहांवर सडकून टीका केली होती. तर बग्गा यांनी हिंसाचार झालेल्या भागात आपण उपस्थितच नव्हतो, असा दावा केला. 'हिंसाचार झालेल्या भागात मी हजर होतो, हे ओब्रायन यांनी सिद्ध करावं. त्यांनी हे सिद्ध केल्यास मी राजकारण सोडेन आणि त्यांना हे सिद्ध करण्यात अपयश आल्यास त्यांनी राजकारण सोडावं,' असं आव्हान त्यांनी दिलं. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Amit Shahअमित शहाBJPभाजपाtmcठाणे महापालिका