शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

देवेंद्र फडणवीस बसवलेला मुख्यमंत्री; राज ठाकरेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 20:27 IST

महाराष्ट्राचं पाणी गुजरातला नेलं जात असल्याचा राज यांचा दावा

नांदेड: देवेंद्र फडणवीस म्हणजे बसवलेला मुख्यमंत्री असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे. मुख्यमंत्री पाणी प्रश्नावर काहीच करत नसल्याचं राज ठाकरे म्हणाले. मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न बिकट आहे. पण तरीही राज्यातलं पाणी गुजरातला वळवायचं काम सुरू आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तोंडातून चकार शब्द काढत नाही. कारण बसवलेला मुख्यमंत्री काय बोलणार?, अशा शब्दांमध्ये राज यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. राज्यातील परिस्थिती गंभीर आहे. पाण्यावरुन वाद सुरू आहेत. मात्र अशा परिस्थितीत महाराष्ट्रातलं पाणी गुजरातला पळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण याविरोधात बोलण्याची महाराष्ट्र सरकारची हिंमत नाही. कारण बसवलेला मुख्यमंत्री काहीही करु शकत नाही, अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. राज्यातलं पाणी गुजरातला नेलं जातं आहे. मराठवाडा, नाशिकचं पाणी गुजरातकडे वळवण्याचं काम सुरू आहे. पण देवेंद्र फडणवीस तोंडातून चकार शब्द काढत नाही, अशी टीका राज यांनी केली.राज्यातील 24 हजार गावं, 151 तालुके दुष्काळग्रस्त असल्याचं सरकारनं जाहीर केलं. मग सरकारनं पाण्यासाठी काय योजना केल्या? राज्यात 1 लाख 20 हजार विहिरी बांधल्या असा दावा मुख्यमंत्री करतात. कुठे आहेत या विहिरी? असे प्रश्न राज यांनी उपस्थित केले. राज्यातील परिस्थिती भीषण आहे. पाण्याची समस्या गंभीर आहे. नोकऱ्या नाहीत. माणसांचे तांडेच्या तांडे शहरांकडे चालले आहेत. मग मोदींनी दाखवलेल्या स्वप्नांचं काय झालं? असा सवाल राज यांनी विचारला. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019nanded-pcनांदेडRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात