शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पश्चिम बंगालच्या निकालात महाराष्ट्राचे प्रतिबिंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 13:37 IST

West Bengal Assembly Elections : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्राच्या राजकारणाचे प्रतिबिंब पडल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपचा वारू असाच वेगाने वाहिला होता. त्याला रोखण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदा करून दाखविले. त्यामुळे ममतादीदींच्या विजयानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालांची आठवण अनेकांना झाली.

ठळक मुद्देपश्चिम बंगालच्या निकालात महाराष्ट्राचे प्रतिबिंबभाजपचा वारू रोखण्याचे काम

विश्वास पाटील कोल्हापूर : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्राच्या राजकारणाचे प्रतिबिंब पडल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपचा वारू असाच वेगाने वाहिला होता. त्याला रोखण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदा करून दाखविले. त्यामुळे ममतादीदींच्या विजयानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालांची आठवण अनेकांना झाली.या दोन्ही निकालांमध्ये काही गोष्टी साम्य असलेल्या आहेत. मुळात या दोन्ही प्रदेशांमध्येही साम्य आहे. सामाजिक प्रबोधनच्या चळवळी या भूमिमध्ये जास्त झाल्या. स्वातंत्र्य चळवळीतील या दोन्ही प्रदेशांचा सहभागही जास्त राहिला. या चळवळीत महाराष्ट्रासारख्याच किंबहुना जास्तच पश्चिम बंगालमध्ये सशस्त्र उठावाच्या चळवळी झाल्या आहेत. दोन्ही प्रांतातील वैचारिक साहित्य अव्वल दर्जाचे मानले जाते. संगीत-चित्रकला याबाबतही या राज्यांची वेगळी छाप आहे. दोन्ही प्रदेशामध्ये लोकांना स्वत:च्या मातीबद्दलचा प्रचंड अभिमान आहे. महाराष्ट्र १९६० च्या दशकानंतर औद्योगिक विकासात पुढारलेले राज्य बनले व बंगाल मात्र मागासलेला राहिला.गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली सगळी यंत्रणा शरद पवार यांच्याविरोधात लावली. इडीपासून विविध चौकशी प्रकरणे मागे लावून त्यांना हैराण करून सोडले. राष्ट्रवादीतील अनेक नेते त्यांनी भाजपमध्ये घेतले. पवार यांची चोहोबाजूनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. अगदी तसेच ममता बॅनर्जी यांच्याबाबतही घडले आहे. रोज एक नेता त्यांच्या पक्षातून फुटून भाजपमध्ये गेल्याचे चित्र दिसत होते. त्या एकट्याच पक्षात राहतात की काय, अशीही हेटाळणी त्यावेळी केली गेली. परंतु पवार असोत की ममतादीदी, त्यांनी या सगळ्याला तोंड दिले.

सत्तेचा वापर करून एखाद्याची चोहोबाजूंनी कोंडी केली जाते, तेव्हा सामान्यत: सामान्य माणूस त्या व्यक्तीच्या मागे उभा राहतो. राष्ट्रवादीला टार्गेट केले नसते, त्यांच्या पक्षातील नेते फोडून घेतले नसते आणि ही निवडणूक झाली असती, तर लोकांनी राष्ट्रवादीला एवढे यश दिले नसते. भाजप सगळ्या ताकदीसह त्यांच्यामागे लागला असताना, हा ८० वर्षांचा म्हातारा त्याला तोंड देऊन लढतोय, असे चित्र वातावरण बदलून गेले. तसेच कांहीसे वातावरण पश्चिम बंगालमध्येही बनल्याचे निकालावरून दिसते.

तिथे तर एका महिलेबद्दल प्रचारात ज्या पध्दतीची भाषा वापरली गेली, ते तेथील मतदारांना आवडले नसल्याचे दिसते. लढणाऱ्या नेतृत्वाला सामान्य माणूस नेहमीच बळ देत आला आहे, याचेही प्रत्यंतर या निकालाने आणून दिले. मतांचे धुव्रीकरण जरूर झाले, परंतु ते ममता बॅनर्जी ताकदीने उभ्या राहिल्या म्हणून.

टॅग्स :PoliticsराजकारणWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१