शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

नव्या सरकारच्या पहिल्या १०० दिवसांचा कार्यक्रम नक्की करा - मोदींच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 03:47 IST

नव्या सरकारचा पहिल्या १00 दिवसांचा कार्यक्रम तयार करण्याचे आदेश पंतप्रधान कार्यालय, निती आयोग व मुख्य वैज्ञानिक सल्लागार विज्ञान सल्लागार यांना दिले आहेत.

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकांचे २३ मे रोजी निकाल लागल्यानंतर आपणच पुन्हा सत्तेवर येणार असा आत्मविश्वास असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या सरकारचा पहिल्या १00 दिवसांचा कार्यक्रम तयार करण्याचे आदेश पंतप्रधान कार्यालय, निती आयोग व मुख्य वैज्ञानिक सल्लागार विज्ञान सल्लागार यांना दिले आहेत. पुढील पाच वर्षांत राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा विकास दर (जीडीपी) दोन अंकी व्हावा, असे लक्ष्य ठेवूनच हा कार्यक्रम तयार केला जाईल.प्रचाराची रणधुमाळीत व्यस्त असताना मोदी यांनी स्वच्छ भारत योजनेच्या धर्तीवर आर्थिक व प्रशासकीय सुधारणा सुचविणारा कार्यक्रम तयार करण्याचे आदेश पंतप्रधान कार्यालय, निती आयोगाचे उपाध्यक्ष, मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. के. विजयराघवन यांना दिले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, २०४७ सालपर्यंत भारताला विकसित देश बनविण्याकरिता पाया मजबूत करण्यासाठी तेल व नैसर्गिक वायू, खाण, शिक्षण या क्षेत्रांची लालफितीच्या कारभारातून सुटका करण्याचे पंतप्रधानांनी ठरविले आहे.त्यासाठी नवीन सरकारच्या पहिल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात या गोष्टींवर भर देण्यात येईल. असे घडल्यास राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा विकास दर आणखी अडीच टक्क्यांनी वाढविणे सहज शक्य होईल.>नदीजोडणी प्रकल्पांना प्राधान्यपिण्याचे पुरेसे पाणी, नद्या परस्परांशी जोडणे या कामांना मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास अग्रक्रम दिला जाईल. ब्रह्मपुत्रा नदीवर चीन त्याच्या हद्दीत वरच्या अंगाला जी धरणे बांधत आहे, त्यामुळे भारतात पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी धरणे, कालवे यांचे जाळे उभारण्याचा मानस आहे. नद्याजोडणी प्रकल्पाद्वारे तामिळनाडूला पुरेसे पाणी मिळावे, याकडे लक्ष देण्यास मोदींनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. रस्ते, विमानतळ, बंदरे आदींचा विकास तसेच नव्या प्रकल्पांचा विचारही या १०० दिवसांच्या कार्यक्रमात केला जाईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019