शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

'आमच्या वर्गातला एक मुलगा अभ्यास न करता पहिला यायचा, मुख्यमंत्र्यांच तसंच झालयं...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 10:24 IST

MNS leader Sandip Deshpande on Uddhav Thackeray: 'प्रश्नम' या संस्थेच्या अहवालात 13 राज्यांमधून उद्धव ठाकरे अव्वल ठरले आहेत.

ठळक मुद्दे 'लसीकरण झालं तरी निर्बंध असतील, तर लसीकरणाचा उपयोग काय?'

मुंबई: नुकतच प्रश्नम या संस्थेने त्यांचा त्रैमासिक अहवाल जाहीर केला. यात भारतातील 13 राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) अव्वल ठरले आहेत. यावरुन आता मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे(sadip deshpande) यांनी त्यांच्यावर खोचक टोला लगावला आहे. दीड वर्षात मुख्यमंत्र्यांनी काय काम केलं ? असा सवालही विचारला.

संदिप देशपांडे म्हणाले की, 'आमच्या वर्गात एक मुलगा होता, तो कधीच अभ्यास करत नव्हता, पण वर्गात पहिला यायचा. एकतर तो खूप हुशार होता किंवा मग कॉपी करुन किंवा मॅनेज करुन पास झाला व्हायचा. असेच मुंख्यमंत्र्यांचेही झाले आहे,' अशा शब्दात संदीप देशपांडेंनी मुख्यमंत्यांना टोला लगावला. तसेच, नंबर एक असण्यासाठी काम करावं लागतं, दीड वर्षात मुख्यमंत्र्यांनी केलं तरी काय?' असा सवालही विचारला.

सरकारला परिणाम भोगावे लागणारसरकारने जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, त्यांना गृहीत धरू नये. रुग्णसंख्या कमी झाली आहे. निर्बंध का उठवत नाही? ज्यांच्या दोन लसी झाल्या त्यांना निर्बंधातून बाहेर काढा ही आमची मागणी आहे. लसीकरण झाले तरी निर्बंध असतील, तर लसीकरणाचा उपयोग काय? असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला. तसेच, सरकारला याचे परिणाम भोगावे लागणार, असा इशाराही दिला. यावेळी त्यांनी लोकल सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यंना पत्र दिल्याचे सांगितले. तर, मुख्यमंत्र्यांना फक्त घरातच बसून राहायचंय. जनता सरकारवर नाराज आहेत, हे वसुली सरकार फक्त हफ्तेखेरी करतंय, असा आरोप देशपांडेंनी यावेळी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे