शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मोदींच्या साखरपेरणीने पवार गळास लागतील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 06:53 IST

भविष्यात मदतीची आशा; बारामतीतील सभा टाळल्यामुळे चर्चा

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : आताच्या निवडणुकीनंतर त्रिशंकू लाकसभेची वेळ आली, तर सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला गळाला लावण्याची शक्यता शिल्लक राहावी, असा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्तापासूनच साखरपेरणी करण्यास सुरुवात केल्याचे संकेत मिळतात. याच उद्देशाने मोदींनी पवार यांच्यावर संयमी टीका केली व खुद्द बारामतीमध्येही स्वत: सभा घेतली नाही, पण मोदी आणि भाजपाच्या या जाळ्यात न अडकण्याची पवार यांची ठाम मनोभूमिका सध्या तरी दिसते.शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन या सुळे यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. स्वत:चा कोणी तगडा उमेदवार न मिळाल्याने कांचन कुल यांना भाजपाने आपले निवडणूक चिन्ह दिले आहे. आधी मोदींची बारामतीत सभा ठरली होेती, पण ऐनवेळी मोदींनी स्वत: सभा न घेण्याचे ठरवून भाजप अध्यक्ष अमित शहांना सभेसाठी पाठविले. बारामतीत येत्या मंगळवारी २३ एप्रिलाला मतदान व्हायचे आहे.

मोदींची सभा झाली की, पवारांचा बालेकिल्ला सर करणे सोपे जाईल, या आशेने भाजपचे स्थानिक नेते बारामतीच्या मोदींच्या सभेची आतुरतेने प्रतिक्षा करत होते. महाराष्ट्रातील इतर सभांमध्ये मोदी पवार यांच्यावर घराणेशाहीच्या राजकारणाबद्दल सातत्याने हल्ला चढवत असल्याने मोदी बारामतीत येऊनही घणाघाती टीका करतील, असे स्थानिक नेत्यांना वाटत होते. कन्या सुप्रिया सुळे व आता नातू पार्थ पवार या रूपाने पवार घराण्याची चौथी पिढी आता सक्रिय राजकारणात उतरली आहे.मोदींनी याआधी महाराष्ट्रात झालेल्या सात सभांमध्ये प्रामुख्याने पवार यांच्यावरच टीका केली होती. याने राष्ट्रवादीचे नेतेही काहीसे चक्रावले होते. पण यामागेही नक्की योजना होती, असे जाणकारांना वाटते. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला ९ ते १२ जागा मिळू शकतात, अशी शक्यता मोदींना त्यांच्या खास खबऱ्यांकडूनच मिळाल्यानंत हा बदल झाला. निवडणुकीनंतर स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तर सत्तेसाठी विरोधी पक्षांमधील काहींना गळाला लावावे लागेल. त्यामुळे राष्ट्रवादी मदतीला येण्याची शक्यता पार पुसली न जाण्याची मोदींनी काळजी घेतली. म्हणूनच पवार यांच्यावर व्यक्तिगत टीका केली तरी मोदींना पवार यांच्यावर भ्रष्टाचारावरून तोंडसुख घेतले नाही. लातूरमध्ये काँग्रेससोबत जाण्यातील पवार यांच्या शहाणपणावरही मोदी यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. ‘अशा फूटपाडू पक्षांसोबत जाणे पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभते का?’, असे मोदींनी विचारले होते.
‘देशात दोन पंतप्रधांनांची भाषा केली जात असताना तुम्ही गप्प कसे बसू शकता? काँग्रेसशी हातमिळवणी केल्यापासून तुम्ही परकियांच्या नजरेने भारताकडे पाहू लागले आहात. तुम्हा रात्री झोप तरी कशी येते,’ असा सवाल अहमदनगरच्या सभेत करून पवार यांची एक राष्ट्रभक्त नेता अशी प्रतिमा मांडण्याची काळजी मोदींनी घेतली. उघड आहे की, जेथे घाव घातल्यावर पवार बदलतील तेथेच वार करण्याची काळजी मोदींनी घेतली.पण मोदींच्या या इशाऱ्यांना पवार बधलेले दिसत नाहीत. मोदींनी बारामतीची सभा रद्द केल्यावरही पवार यांनी मोदींवर टीका करणे सोडले नाही. पवार म्हणाले ‘ मोदी पुढे काय करीतल याची मला भीती वाटते. त्यांनी राजकारणाचे धडे माझ्याकडून घेतले असे ते पूर्वी एकदा म्हणाले होते. पण हल्ली हा माणूस काय करेल हे कळेनासे झाल्याने मला भय वाटते.’यंदा पाठिंबा देण्याची शक्यता कमीनिदान यावेळी तरी पवार मोदींच्या गळाला लागण्याच्या मन:स्थितीत नाहीत, असे सध्या दिसते. सन २०१४ मध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस सरकारला स्वत:हून अनाहूत पाठिंबा देऊ करून पवार एकदा मोदींच्या जाळ्यात अडकले होते, पण सूत्रांनुसार पवार यावेळी ‘संपुआ’च्या रथावर घट्ट मांड ठोकून बसले आहेत व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेही त्यांच्याशी फोनवर नियमित संपर्क ठेवून असतात.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा