शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

‘ही’ माझी वैयक्तिक भूमिका, महाविकास आघाडीची नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण

By प्रविण मरगळे | Updated: December 17, 2020 12:56 IST

दिल्लीत सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकार या कायद्यात काही बदल करेल असा अंदाज आहे, त्यात शेतकरी हित असेल का? हे पाहू असंही अजित पवारांनी सांगितले.

ठळक मुद्देलवकरच केंद्रीय पथक अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रात येत आहे,केंद्राकडून महाराष्ट्राला मदत होईल अशी अपेक्षा आहे, परंतु किती मदत होऊ शकते हे आत्ताचं सांगणे उचित होणार नाहीया बैठकीत प्राथमिक स्वरुपात चर्चा होईल, काही जणांचे म्हणणं आहे संपूर्ण विधेयक रद्द करा

मुंबई – कृषी कायद्याच्या संदर्भात आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे, मात्र एका बैठकीतून हा प्रश्न सुटणार नाही, ही माझी वैयक्तिक भूमिका आहे, महाविकास आघाडीची नाही असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे, कृषी कायद्याबाबत होणाऱ्या बैठकीपूर्वी अजितदादांनी माध्यमांशी संवाद साधला आहे, त्यावेळी ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, देशात शेतकरी आंदोलन करत आहे, सुप्रीम कोर्टानेही केंद्राला चर्चा करण्याचं सांगितलं आहे, आमची भूमिका मान्य करा अशी आग्रही भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे, दिल्लीत हे आंदोलन चिघळलं आहे, त्यामुळे कृषी विधेयकाबाबत काही प्रमाणात बदल करण्याचे निर्णय घेतले जातील, पण बिल संपूर्ण रद्द करावं ही शेतकऱ्यांची भूमिका आहे, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिला आहे, आज त्याचबाबत महत्त्वाची बैठक होत आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच या बैठकीत प्राथमिक स्वरुपात चर्चा होईल, काही जणांचे म्हणणं आहे संपूर्ण विधेयक रद्द करा, परंतु सगळ्यांशी चर्चा करू, मात्र एका बैठकीतून प्रश्न सुटणार नाही, ही माझी वैयक्तिक भूमिका आहे, महाविकास आघाडीची नाही असंही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केले, त्याचसोबत दिल्लीत सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनामुळे केंद्र सरकार या कायद्यात काही बदल करेल असा अंदाज आहे, त्यात शेतकरी हित असेल का? हे पाहू असंही अजित पवारांनी सांगितले.

दरम्यान, यंदा ३१० लाख टन साखर तयार होईल, तेवढी साखर परदेशात निर्यात केली जाईल, पण साखरेचा दर ३१ रुपयांवरून वाढवावा त्यामुळे ५ लाख शेतकऱ्यांना फायदा होईल असं अजितदादांनी सांगितले, तसेच लवकरच केंद्रीय पथक अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रात येत आहे, यात केंद्राकडून महाराष्ट्राला मदत होईल अशी अपेक्षा आहे, परंतु किती मदत होऊ शकते हे आत्ताचं सांगणे उचित होणार नाही असं अजित पवार म्हणाले, तर मेट्रो कारशेडबाबत संध्याकाळी ५ वाजता बैठक होईल अशी माहिती अजितदादांनी दिली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारFarmerशेतकरी