शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

“२०२४ मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली केंद्रात काँग्रेसचे सरकार येणार!”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 3:32 PM

२०२४ मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली केंद्रात काँग्रेसचे सरकार येणार असल्याचा मोठा दावा नाना पटोले यांनी केला.

ठळक मुद्दे२०२४ मध्ये काँग्रेसची सत्ता केंद्रात स्थापन होईलदेशामध्ये भाजपला सशक्त पर्याय फक्त काँग्रेसनाना पटोलेंची पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार टीका

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून काही मुद्द्यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडीत कुरबुरी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाळत ठेवणे, फोन टॅपिंगचे मोठे दावे करत स्वबळाचा नारा दिला आहे. यावरून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे अन्य पक्ष नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी काही काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी नाना पटोले अनुपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाल्या. यावरून पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, आपल्याला निमंत्रण नसल्याचे नाना पटोले म्हणाले. तसेच २०२४ मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली केंद्रात काँग्रेसचे सरकार येणार असल्याचा मोठा दावाही पटोले यांनी केला. (nana patole claims congress will form govt in center under leadership of rahul gandhi in 2024)

नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना, याआधी सुद्धा आम्हाला धोका मिळाला आहे. २०१४ सारखा धोका पुन्हा मिळू नये, यासाठी पक्ष रणनीती आखेल. त्यानुसारच काम केले जाईल, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. शरद पवार स्वबळाच्या मुद्द्यावरुन नाराज आहेत. त्यामुळे काँग्रेस नेते त्यांना भेटायला गेले का, अशी विचारणा नाना पटोले यांना पत्रकारांनी केली. यावर बोलताना ते म्हणाले की, भाजपमुळे संपुष्टात आलेल्या ओबीसींच्या आरक्षणाच्या विरोधात आंदोलन करणार आहोत, त्यासंदर्भातील चर्चा आमच्या नेत्यांनी शरद पवारांसोबत केली, असे नाना पटोले यांनी सांगितले.

“भारत एवढा असुरक्षित यापूर्वी कधीच नव्हता”; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

२०२४ मध्ये काँग्रेसची सत्ता केंद्रात स्थापन होईल

२०२४ मध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात काँग्रेसचे सरकार येईल. देशामध्ये भाजपला सशक्त पर्याय फक्त काँग्रेस आहे. केंद्रातील मोदी सरकारने देश विकायला काढला आहे. लोकांचे जगणे मुश्किल केले आहे. कोरोना परवडला, परंतु महागाई परवडत नाही, अशी जनभावना तयार होऊ लागली आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. 

राम मंदिरासाठी योगदान दिलेल्या १२ कोटी कुटुंबांशी RSS संपर्क करणार; IT सेलही होणार सुरू

भाजप बहुजन समाज विरोधी

भारतीय जनता पक्ष हा बहुजन समाजविरोधी, ओबीसी विरोधी आहे. या समाजातील लोकांचा ते वापर करून नंतर त्यांना बाजूला करतात. याचा वारंवार अनुभव आलेला आहे. गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांचाही भाजपने वापर करुन नंतर त्यांना डावलले. खडसे यांना बदनाम केले गेले. भाजप हा बहुजन समाज विरोधी असून त्यांच्यामुळे ओबीसी व मराठा समाजाचे आरक्षणही रद्द झाले आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. 

“रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था नाना पटोलेंची झालीये”; भाजपचा खोचक टोला

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी भाजपतील अनेक बहुजन नेत्यांचे खच्चीकरण केले, हे सर्वांनाच माहिती आहे. खडसेंचे तर राजकीय नुकसान करण्याचा प्रयत्न झाला. झोटिंग समितीचा अहवाल अद्याप वाचला नाही. परंतु, तो पुढे येईल, तेव्हा त्यातील फार्स कळून येतील. मागील सरकारच्या काळातील अनेक चिठ्ठे बाहेर आले तर फडणवीस आणि तत्कालीन मंत्री गोत्यात येतील, असा दावा नाना पटोले केला आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी