शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'इंद्र देव बदमाश होता; आता नरेंद्र, देवेंद्राला मारायचं की सोडायचं हे ठरवा!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 16:39 IST

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी नागपुरातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

नागपूर - काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नाना पटोलेंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. नाना पटोले म्हणाले, इंद्र देव फार बदमाश होता आणि फार लालचीही होता. मात्र त्याच्यावर संकट आले तर तो मोठ्या देवांकडे धावायचा. इथे तर दोन्ही इंद्र आहेत. वरती नरेंद्र आणि खालती देवेंद्र. आता या दोन्ही इंद्रांचे काय करायचे, यांना मारायचं की सोडायचं हे तुम्हाला ठरवायचे आहे." नागपुरातल्या दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत नाना पटोले यांनी हे वक्तव्य केले. या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. 

पुढे ते म्हणाले, सरकार रोज जीआर काढत आहे. सरकारनं जीआर काढल्यानंतर मी कलेक्टरला सांगायचो की, तातडीनं अंमलबजावणी करा, तेव्हा कलेक्टरच सांगायचा, साहेब दोन ते तीन दिवस थांबा, कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर हा जीआर बदललेला पाहाल. दर आठवड्याला जीआर काढायचा आणि दुसऱ्याच आठवड्यात तो जीआर बदलायचा. आचारसंहिता लागू करण्याच्या आधीही कॅबिनेटची बैठक त्यांनी घेतली होती, त्यावेळी तर 147 जीआर काढले. नंतर ते जीआर पुढच्या तीन वर्षाला लागू होतील, असं समजलं, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी नागपुरातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विरोधात नाना पटोले निवडणूक लढवत आहेत. त्यासाठी त्यांनी जोरदार प्रचारही सुरू केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नाना पटोलेंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019